शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचा सर्वोत्तम पर्याय :  प्रदीप नंदराजोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:28 IST

कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. याउलट परिस्थिती ही मध्यस्थी केंद्राचा पर्याय स्वीकारणाऱ्या याचिकाकर्ता आणि त्याचा विरोधक यांची असते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा यांची बचत तर होतेच याशिवाय आपल्या दाव्याच्या निकालाचेही अधिकार मिळतात. त्यामुळे वाद वा तंटे कायमस्वरूपी मिटविण्यासाठी न्यायालयांतील मध्यस्थी केंद्र हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग यांनी केले.

ठळक मुद्देन्यायाधीशांच्या एकदिवसीय परिषदेत मार्गदर्शन

नाशिक : कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. याउलट परिस्थिती ही मध्यस्थी केंद्राचा पर्याय स्वीकारणाऱ्या याचिकाकर्ता आणि त्याचा विरोधक यांची असते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा यांची बचत तर होतेच याशिवाय आपल्या दाव्याच्या निकालाचेही अधिकार मिळतात. त्यामुळे वाद वा तंटे कायमस्वरूपी मिटविण्यासाठी न्यायालयांतील मध्यस्थी केंद्र हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग यांनी केले. राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय मध्यस्थी केंद्र देखरेख समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यातर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शनिवारी (दि.१२) न्यायाधीशांच्या एकदिवसीय विभागीय परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.मध्यस्थी केंद्राचा निकाल कायमस्वरूपीसासू-सासरे, पती, मुले या सर्वांमध्ये समन्वय साधणारी गृहिणी ही मध्यस्थीचेच उदाहरण असल्याचे सांगतानाच भारतीय करार कायद्याच्या कलम २८ नुसार करार हा कायद्याने बंधनकारक असला तरी मध्यस्थी आणि लवाद हे त्यास अपवाद असल्याचे न्यायमूर्ती नांदराजोग यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन दाव्यात निकाल विरोधात गेल्यास अपील करावे लागते तर मध्यस्थी केंद्रातील निकाल हा समझोत्याने झालेला असल्याने कायमस्वरूपी असतो. मध्यस्थाची भूमिका बजावताना न्यायाधीशांनी याचिकाकर्ता व विरोधक या दोहोंच्याही नजरेतून दाव्याकडे बघण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय