शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचा सर्वोत्तम पर्याय :  प्रदीप नंदराजोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:28 IST

कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. याउलट परिस्थिती ही मध्यस्थी केंद्राचा पर्याय स्वीकारणाऱ्या याचिकाकर्ता आणि त्याचा विरोधक यांची असते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा यांची बचत तर होतेच याशिवाय आपल्या दाव्याच्या निकालाचेही अधिकार मिळतात. त्यामुळे वाद वा तंटे कायमस्वरूपी मिटविण्यासाठी न्यायालयांतील मध्यस्थी केंद्र हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग यांनी केले.

ठळक मुद्देन्यायाधीशांच्या एकदिवसीय परिषदेत मार्गदर्शन

नाशिक : कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. याउलट परिस्थिती ही मध्यस्थी केंद्राचा पर्याय स्वीकारणाऱ्या याचिकाकर्ता आणि त्याचा विरोधक यांची असते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा यांची बचत तर होतेच याशिवाय आपल्या दाव्याच्या निकालाचेही अधिकार मिळतात. त्यामुळे वाद वा तंटे कायमस्वरूपी मिटविण्यासाठी न्यायालयांतील मध्यस्थी केंद्र हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग यांनी केले. राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय मध्यस्थी केंद्र देखरेख समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यातर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शनिवारी (दि.१२) न्यायाधीशांच्या एकदिवसीय विभागीय परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.मध्यस्थी केंद्राचा निकाल कायमस्वरूपीसासू-सासरे, पती, मुले या सर्वांमध्ये समन्वय साधणारी गृहिणी ही मध्यस्थीचेच उदाहरण असल्याचे सांगतानाच भारतीय करार कायद्याच्या कलम २८ नुसार करार हा कायद्याने बंधनकारक असला तरी मध्यस्थी आणि लवाद हे त्यास अपवाद असल्याचे न्यायमूर्ती नांदराजोग यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन दाव्यात निकाल विरोधात गेल्यास अपील करावे लागते तर मध्यस्थी केंद्रातील निकाल हा समझोत्याने झालेला असल्याने कायमस्वरूपी असतो. मध्यस्थाची भूमिका बजावताना न्यायाधीशांनी याचिकाकर्ता व विरोधक या दोहोंच्याही नजरेतून दाव्याकडे बघण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय