शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

साडेपाच लाख शेतकऱ्यांना होणार मदतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:36 AM

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी स्वाभिमान योजना : आजपासून गाव मेळावे

 

 

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.केंद्र सरकारने ज्या कुटुंबाकडे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली असून, अशा कुटुंबाची गावपातळीवर माहिती गोळा करण्याच्या सूचना आहेत. नाशिक जिल्ह्यात आजवर ८५३ गावांची सुमारे ८० टक्के माहिती विविध माध्यमांतून संकलित करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने संगणकीय सातबारा, कृषी खात्याचे अ‍ॅग्रो सेन्सेक्स, नैसर्गिक आपत्तीची मदत वाटलेल्या शेतकºयांच्या यादीचा समावेश आहे. या उपरही कोणी राहून गेले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून गुरुवार दि. ७ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात गावनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या मेळाव्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्यात येणार आहे. गावनिहाय कुटुंबाच्या क्षेत्राची यादी तयार करून ती ग्रामपंचायतीत जाहीर करण्याबरोबरच वाचून दाखविली जाणार आहे. त्यात समावेश नसलेल्या शेतकºयांनी आपल्याकडील पुरावे सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी ग्रामसमितीही गठित करण्यात येणार असून, पात्र व अपात्र शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार झालेल्या यादीचे तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाºयांनी या यादीची सॅम्पल खात्री करावी, असेही शासनाने म्हटले असून, ही संपूर्ण यादी २६ फेब्रुवारीपर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदार पाहता, सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.चतुर्थ श्रेणीला लाभ; सेवानिवृत्त वंचितशासनाने या योजनेसाठी कोणाला अपात्र ठरवायचे याची विस्तृत माहिती दिली नसली तरी, शासकीय सेवेत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना मात्र त्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल तर लाभ मिळेल, मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयाला जर दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार असेल तर तो या योजनेपासून वंचित राहणार आहे.