शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

साडेपाच लाख शेतकऱ्यांना होणार मदतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:37 IST

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी स्वाभिमान योजना : आजपासून गाव मेळावे

 

 

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.केंद्र सरकारने ज्या कुटुंबाकडे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली असून, अशा कुटुंबाची गावपातळीवर माहिती गोळा करण्याच्या सूचना आहेत. नाशिक जिल्ह्यात आजवर ८५३ गावांची सुमारे ८० टक्के माहिती विविध माध्यमांतून संकलित करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने संगणकीय सातबारा, कृषी खात्याचे अ‍ॅग्रो सेन्सेक्स, नैसर्गिक आपत्तीची मदत वाटलेल्या शेतकºयांच्या यादीचा समावेश आहे. या उपरही कोणी राहून गेले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून गुरुवार दि. ७ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात गावनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या मेळाव्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्यात येणार आहे. गावनिहाय कुटुंबाच्या क्षेत्राची यादी तयार करून ती ग्रामपंचायतीत जाहीर करण्याबरोबरच वाचून दाखविली जाणार आहे. त्यात समावेश नसलेल्या शेतकºयांनी आपल्याकडील पुरावे सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी ग्रामसमितीही गठित करण्यात येणार असून, पात्र व अपात्र शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार झालेल्या यादीचे तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाºयांनी या यादीची सॅम्पल खात्री करावी, असेही शासनाने म्हटले असून, ही संपूर्ण यादी २६ फेब्रुवारीपर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदार पाहता, सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.चतुर्थ श्रेणीला लाभ; सेवानिवृत्त वंचितशासनाने या योजनेसाठी कोणाला अपात्र ठरवायचे याची विस्तृत माहिती दिली नसली तरी, शासकीय सेवेत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना मात्र त्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल तर लाभ मिळेल, मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयाला जर दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार असेल तर तो या योजनेपासून वंचित राहणार आहे.