शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

येवलेकरांच्या आनंदावर विरजण

By admin | Updated: September 12, 2016 01:05 IST

चाचणी अर्धवट : धरणातील साठा कमी झाल्याचे सांगत पुणेगावचे पाणी केले बंद

 पाटोदा : हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन येवला तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्यास तालुक्यातील बाळापूरपर्यंत चाचणीसाठी २६ आॅगस्टपासून पुणेगाव धरण समूहातून सोडण्यात आलेले पाणी संबंधित विभागाने (दि. १० आॅगस्ट) रात्री उशिरा धरण समूहात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देत बंद केल्याने येवलेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे. चाळीस वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असण्याऱ्या या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन पाणी चाचणी नक्की यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र आता पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या असून, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.येवला व चांदवड तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या या कालव्याच्या निर्मितीस तत्कालीन आमदार कै. जनार्धन पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून रोजगार हमी योजनेतून प्रारंभ केला होता; मात्र तद्नंतर निधी व सरकार बदलामुळे या कालव्याचे काम प्रलंबित होते. कालव्याचे राजकारण करीत अनेक निवडणुका यशस्वी झाल्या मात्र काम रेंगाळलेलेच होते. दरम्यानच्या काळात २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातून निवडणूक लढविली त्यावेळी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव कालव्याचे काम पूर्ण करून येवला तालुक्यात हरित क्रांती करू असे आश्वासन दिले होते. किरकोळ अपवाद वगळता कालव्याचे येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत काम पूर्ण झाले आहे. यावर्षी धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरल्याने ओव्होरफ्लो च्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत पाणी चाचणी घ्यावी अशी मागणी येवला तालुका राष्ट्रवादी कॉंगेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार व लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथे कालव्यावरच आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेवून २६ आॅगस्ट पासून कालव्यास चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले होते. तब्बल ११ दिवस अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी ५ सप्टेंबर रोजी परसूल येथून दरसवाडी धरणात प्रवाहित झाल्याने येवलेकारांच्या पाणी चाचणीच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. पाणी दरसवाडी धरणात सोडून साठा करून हे पाणी बाळापुर पर्यंत चाचणीसाठी सोडले जाणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकरी दरसवाडी धरण परिसरात पाहणी करून पाणी चाचणी साठी नक्की सुटेल व बाळापुर पर्यंत चाचणी पूर्ण होईल अशी अशा बाळगून होते. मात्र शनिवारी उशिरा संबधित विभागाने पावसाने उघडीप दिल्याने धरण समुहातील पाणी साठा कमी झाल्याचे कारण पुढे करीत पाणी बंद के ले. यामुळे येवेलेकरांणा पुन्हा पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचा ५० ते ६३ किलोमीटर दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ५० ते ६३ किलोमीटर दरम्यान कालव्यात सिमेंट कॉंक्र ीटचे अस्तरीकरण कण्यात यावे. त्यामुळे पाणी गळती कमी होईल.पुणेगाव ते दरसवाडी दरम्यान मोठया प्रमाणात पाणी चोरी व गळती झाल्याने पाण्याचा प्रवाह कमी झाला व पाणी पोहोचण्यास उशीर झाल्यानेच बाळापुर पर्यंत चाचणी होऊ शकली नाहीअसे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.दरसवाडी धरणाची क्षमता १०८ द.ल. घनफुट इतकी आहे. मात्र धरणात आज अखेरपर्यंत फक्त ८० द.ल. घनफुट इतकेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत चाचणी होणे शक्यच नाही. पुणेगावच्या पाण्याने दरसवाडी धरण न भरता पाणी सरळ येवला तालुक्यातील डोंगरगाव कालव्या कडे वळविण्यात यावे यासाठी आमदार छगन भुजबळ यांनी या कामासाठीसुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे मात्र त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याने हे काम प्रलंबित आहे. शासनाने या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देवून सदरचे काम तत्काळ सुरु करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)