शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:09 IST

: जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी,रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावर

नाशिक : जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.  जिल्हा किसान सभा संचलित बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतक री संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांना कर्जपुरवठाही बॅँकांकडून केला जात नाही. त्यामुळे सावकारांच्या कर्जावर शेतकरी शेती कसून देश पोसत आहे. २००८ व २०१७ च्या केंद्र व राज्य शासनाच्या कर्जमाफीपासून या बंद उपसा जलसिंचन संस्थेचे सभासद शेतकरी अद्याप वंचित असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील बंद उपसा तापी खोºयातील संस्थांना एकनाथ खडसे व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न करून कर्जमुक्ती दिली; मात्र नाशिक जिल्हा अद्याप वंचित राहिला हे दुर्दैवच, असे म्हटले आहे. बागायती जिल्ह्यातील शेतकरीदेखील कर्जबाजारीमुळे गळफास लावत आहेत; मात्र सरकारला याबाबत कुठलेही गांभीर्य नसल्याने किसान सभेने ‘जवाब दो’ मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला. सहकारी संस्थांचे सभासद असलेल्या शेतकºयांनी शेती विकून कर्ज भरले असून, जिल्हा बॅँकेकडून करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात मुद्दलापेक्षा अधिक रक्कमही जमा केली आहे; मात्र अद्याप शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा कायम असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकू ण आठ संस्था असून, त्या त्वरित कर्जमुक्त कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भास्कर शिंदे, संपत थेटे, मधुकर कसबे, निवृत्ती कसबे, भीमा उगले आदींच्या स्वाक्षºया आहेत.रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावरसोमवारी शहराचे तपमान ३३ अंशाच्या पुढे सरकले असताना, रणरणत्या उन्हात प्रकल्पबाधित बळीराजा बी. डी. भालेकर मैदानावर एकत्र आला. एकजूट होऊन शेतकºयांनी शासनाकडे ‘जवाब दो’चा एल्गार लगावत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, येवला या तालुक्यांमधील शेतकरी सहभागी झाले होते. तसेच बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतकरी संघर्ष समितीचे क ार्यकर्तेही सामील झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी