शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:09 IST

: जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी,रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावर

नाशिक : जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.  जिल्हा किसान सभा संचलित बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतक री संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांना कर्जपुरवठाही बॅँकांकडून केला जात नाही. त्यामुळे सावकारांच्या कर्जावर शेतकरी शेती कसून देश पोसत आहे. २००८ व २०१७ च्या केंद्र व राज्य शासनाच्या कर्जमाफीपासून या बंद उपसा जलसिंचन संस्थेचे सभासद शेतकरी अद्याप वंचित असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील बंद उपसा तापी खोºयातील संस्थांना एकनाथ खडसे व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न करून कर्जमुक्ती दिली; मात्र नाशिक जिल्हा अद्याप वंचित राहिला हे दुर्दैवच, असे म्हटले आहे. बागायती जिल्ह्यातील शेतकरीदेखील कर्जबाजारीमुळे गळफास लावत आहेत; मात्र सरकारला याबाबत कुठलेही गांभीर्य नसल्याने किसान सभेने ‘जवाब दो’ मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला. सहकारी संस्थांचे सभासद असलेल्या शेतकºयांनी शेती विकून कर्ज भरले असून, जिल्हा बॅँकेकडून करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात मुद्दलापेक्षा अधिक रक्कमही जमा केली आहे; मात्र अद्याप शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा कायम असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकू ण आठ संस्था असून, त्या त्वरित कर्जमुक्त कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भास्कर शिंदे, संपत थेटे, मधुकर कसबे, निवृत्ती कसबे, भीमा उगले आदींच्या स्वाक्षºया आहेत.रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावरसोमवारी शहराचे तपमान ३३ अंशाच्या पुढे सरकले असताना, रणरणत्या उन्हात प्रकल्पबाधित बळीराजा बी. डी. भालेकर मैदानावर एकत्र आला. एकजूट होऊन शेतकºयांनी शासनाकडे ‘जवाब दो’चा एल्गार लगावत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, येवला या तालुक्यांमधील शेतकरी सहभागी झाले होते. तसेच बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतकरी संघर्ष समितीचे क ार्यकर्तेही सामील झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी