शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे मतमोजणीप्रकिया शांततेत

By admin | Updated: May 17, 2014 00:34 IST

शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाही

शहरात शांततामय वातावरण : अनुचित घटना नाहीनाशिक : पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केलेल्या यशस्वी पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनामुळे लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली़ या प्रक्रियेनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली़ या दोन्ही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती़ त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी एक दिवस अगोदरपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ मतमोजणीदरम्यान उमेदवारांच्या मतांच्या आघाडी-पिछाडीदरम्यान विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक राजकीय पक्षाच्या वाहनासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था तसेच त्यांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली होती़ मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्रधारकाव्यतिरिक्त कोणीही जाणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली़ लोकसभा मतदानाच्या दिवशी झालेले पोलीस कर्मचार्‍यांचे हाल मतमोजणीच्या दिवशी मात्र झाले नाही़ सेंट्रल वेअर हाऊसच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरेकेडिंग तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तंबूची उभारणी करण्यात आली होती़ पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त डॉ़ डी़एस़ स्वामी, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, हेमराजसिंह राजपूत हे मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून होते़ शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी शहरातील पक्षांची कार्यालये तसेच रस्त्यांवर चांगला बंदोबस्त तैनात केला होता़ त्यामुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही़ दरम्यान, मतमोजणीप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़१८ मेनंतर विजयी मिरवणुका लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांना विजयी मिरवणूक काढावयाची असल्यास दोन दिवस वाट पहावी लागणार आहे़ १८ मेनंतर मिरवणुकीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली़