शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पाणी कपातीची तयारी ठेवा, जलसंपदाने महापालिकेला धाडले पत्र

By suyog.joshi | Updated: September 14, 2023 16:02 IST

15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.  

- सुयोग जोशी

नाशिक - यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणीसाठा अवघ्या चाळीस टक्याच्या आतच असल्याने भविष्यातील पाण्याची स्थिती पाहता जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी कपातीची तयारी ठेवण्याचे पत्र पाठवले आहे. 15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.  

नाशिक शहराची तहान भागविणारे गंगापूर धरण 95 टक्के भरले असले तरी मराठवाड्यासाठी संजीवनी असलेले शंभर टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण जेमतेम 35 टक्के इतकेच भरले आहे. नाशिकमधील धरणातून मागील तीन महिन्यात केवळ नऊ टीएमसी पाणी जायकवाडिला पोहचले आहे. मेंढिगरी समितीच्या समन्यायी पाणी वाटप धोरणानूसार येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा नसेल तर नाशिक व नगरमधील धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. 

दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला जिल्ह्यातील धरणातील जलसाठा पाहून पाणी आरक्षण दिले जाते. त्या अगोदर सर्व पाणी वापर संस्थांनी त्यांची मागणी जलसंपदा विभाग व जिल्हाप्रशासनाकडे नोंदवायची असते. त्यानूसार महापालिकेने वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी सहा हजार दोनशे दलघफू पाण्याची मागणी नोंदवली होती. पण जिल्हासह जायकवाडीतील पाणीसाठा पाहता जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवत पाण्याचा वापर काटकसरीने करा अशा स्पष्ट सूचना देते पाणी कपातीची तयारी ठेवा असे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक