शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

कौतुकाचे चीज व्हावे !

By किरण अग्रवाल | Updated: August 19, 2018 01:15 IST

आपल्याकडे कोणत्याही यशाला तत्कालिक कौतुकापलीकडे जाऊन बघण्याची दृष्टीच नाही. त्यामुळे पुरस्कारार्थीचे प्रासंगिक अभिनंदन वगैरे केले की विषय संपल्यात जमा होतो. त्यामुळे संस्थागत पातळीवर संबंधित यशोदायी कामाची माहिती घेऊन ते अन्यत्रही साकारण्याची प्रक्रिया फारशी घडून येत नाही. सरकारी यंत्रणांनी यासंदर्भात प्रयत्न केल्यास व यशस्वी कार्याचे ‘डाक्युमेंटेशन’ करून ते इतरांना उपलब्ध करून दिल्यास अनेकांची वाटचाल सुकर व सुखदायी ठरू शकेल.

आपल्याकडे कोणत्याही यशाला तत्कालिक कौतुकापलीकडे जाऊन बघण्याची दृष्टीच नाही. त्यामुळे पुरस्कारार्थीचे प्रासंगिक अभिनंदन वगैरे केले की विषय संपल्यात जमा होतो. त्यामुळे संस्थागत पातळीवर संबंधित यशोदायी कामाची माहिती घेऊन ते अन्यत्रही साकारण्याची प्रक्रिया फारशी घडून येत नाही. सरकारी यंत्रणांनी यासंदर्भात प्रयत्न केल्यास व यशस्वी कार्याचे ‘डाक्युमेंटेशन’ करून ते इतरांना उपलब्ध करून दिल्यास अनेकांची वाटचाल सुकर व सुखदायी ठरू शकेल.शासनातर्फे दरवर्षी विविध स्तरावर उत्कृष्ट कार्यासाठी ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जातात. यात जिल्हा परिषद यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असते. यंदाही स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, निफाड तालुक्यातील सुकेणे, बागलाणमधील डांगसौंदाणे तसेच सावकी, ता. देवळा, शिरसाने व राजदेरवाडी, ता. चांदवड, जळगाव नेऊर, ता.येवला आदींना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले. शासनाने आखून दिलेल्या स्वच्छ व ‘स्मार्ट’ नेसमध्ये अंतर्भूत असलेल्या निकषातील उत्कृष्ट कामगिरीमुळे हा गौरव संबंधितांना प्राप्त झाला. याहीखेरीज अन्य योजनांमध्ये अशा संस्थांचे वेळोवेळी गौरव होत असतात. ते इतरांसाठी प्रेरणादायीच ठरतात. पण, फक्त कौतुकाच्या पातळीवर ते सीमित न ठेवता संबंधित ग्रामपंचायतींनी केलेल्या विशेष कार्याची टिपणी करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना अनुकरण अगर अवलोकनासाठी पाठविली गेली तर त्यातून खऱ्या अर्थाने संबंधित पुरस्कारार्थींचे कार्य इतरांसाठी दिशादर्शक ठरू शकेल. आज तसे होताना दिसत नाही. यंत्रणा आपल्या पातळीवर गुणांकन करतात व पुरस्कारार्थींची निवड होते. त्यात नंबर हुकलेल्यांना आपण कुठे मागे पडलो हे लक्षात येण्याची काही व्यवस्था करता आल्यास पुढच्या वेळी निश्चितच फरक दिसून येऊ शकेल. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच तरुण असून, नव्या उमेदीने व विविध कल्पना राबवून ते ग्रामविकास करण्यासाठी धडपडतांना दिसतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, तंटामुक्ती, कुºहाडबंदी, आरोग्य-शिक्षण आदी विविध बाबतीत काहींनी अप्रतिम काम चालविले आहे. ‘लोकमत’च्या सरपंच अवॉर्डच्या निमित्तानेही ते प्रामुख्याने बघावयास मिळाले होते. अशांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची माहिती इतरांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याचसोबत पुरस्कारप्राप्त सरपंचांना ‘रोल मॉडेल’ म्हणून अन्य ग्रामपंचायतींमध्ये मार्गदर्शनासाठी पाठविले गेले तर त्यातून संबंधितांचा व्यापक अर्थाने नेतृत्व विकास घडून येतानाच, स्पर्धेत मागे पडलेल्यांनाही मार्गदर्शन लाभू शकेल. पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारही जिल्ह्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते आमीर खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधितांचा गौरव करण्यात आला. अशांचीही नोंद घेऊन त्यांचे प्रयत्न इतरांच्या निदर्शनास आणून दिले जावयास हवे. केवळ तात्कालिक कौतुक व सोहळा आटोपून न थांबता अभिनंदनीय कार्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचविली जावी, इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिक