शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तळघर बनले डासांचे आगर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:24 IST

नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देरोगराईला निमंत्रण : महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुलांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांत डेंग्यूमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्यावर्षी शहरात तीन हजारांहून अधिक संशयित डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यापैकी एक हजार नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळले होते. यंदा कोरोनामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे नागरिकांचेदेखील पावसाळ्यात आरोग्य विषयक दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या अनेक भागांत व्यापारी संकुले व अन्य रहिवासी इमारतींच्या तळघरात पाणी साचत असून, त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होत आहे. पावसाळ्यात इमारतीच्या छतावर, तळघरात किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होते. महापालिकेच्या सर्वेक्षणात असे अनेकदा आढळलं आहे. त्यानुसार संबंधित भागात डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने इमारतमालकांना अथवा विकासकांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्यापलीकडे कोणतीही कारवाई होत नसल्याने दरवर्षीच असा प्रश्न निर्माण होत असतो. सध्या कोरोनाचे संकट असताना आता पावसाळ्यामुळे या आजारांनी डोके वर काढले आहे.जुलै महिन्यात शहरात ३२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने वेळीच उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.अनास्था : कचऱ्यांच्या ढिगांकडे सोयीस्कर डोळेझाकमहात्मा गांधीरोडवरील व्यापारी संकुले म्हणजेच स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे नेहमीप्रमाणे तळघरात पाणी साचले असून, डासांची निर्मिती होत आहे, मात्र याकडे महापालिका आणि संबंधित व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. महानगरातील अनेक निवासी संकुले, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ग्राऊंड फ्लोअर आणि तळघरांमध्ये घाण आणि कचºयाचा प्रश्न वाढलेला आहे. त्याचा त्रास प्रामुख्याने आसपासच्या रहिवाशांना होत असून त्यांना कुणीच वाली नाही, अशी अवस्था आहे. केवळ याच नव्हे तर शहरातील अन्य भागांतदेखील डासनिर्मितीची अनेक ठिकाणे आणि ब्लॅकस्पॉट असून, त्याकडे लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस