शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

तळघर बनले डासांचे आगर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:24 IST

नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देरोगराईला निमंत्रण : महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुलांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांत डेंग्यूमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्यावर्षी शहरात तीन हजारांहून अधिक संशयित डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यापैकी एक हजार नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळले होते. यंदा कोरोनामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे नागरिकांचेदेखील पावसाळ्यात आरोग्य विषयक दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या अनेक भागांत व्यापारी संकुले व अन्य रहिवासी इमारतींच्या तळघरात पाणी साचत असून, त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होत आहे. पावसाळ्यात इमारतीच्या छतावर, तळघरात किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होते. महापालिकेच्या सर्वेक्षणात असे अनेकदा आढळलं आहे. त्यानुसार संबंधित भागात डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने इमारतमालकांना अथवा विकासकांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्यापलीकडे कोणतीही कारवाई होत नसल्याने दरवर्षीच असा प्रश्न निर्माण होत असतो. सध्या कोरोनाचे संकट असताना आता पावसाळ्यामुळे या आजारांनी डोके वर काढले आहे.जुलै महिन्यात शहरात ३२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने वेळीच उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.अनास्था : कचऱ्यांच्या ढिगांकडे सोयीस्कर डोळेझाकमहात्मा गांधीरोडवरील व्यापारी संकुले म्हणजेच स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे नेहमीप्रमाणे तळघरात पाणी साचले असून, डासांची निर्मिती होत आहे, मात्र याकडे महापालिका आणि संबंधित व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. महानगरातील अनेक निवासी संकुले, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ग्राऊंड फ्लोअर आणि तळघरांमध्ये घाण आणि कचºयाचा प्रश्न वाढलेला आहे. त्याचा त्रास प्रामुख्याने आसपासच्या रहिवाशांना होत असून त्यांना कुणीच वाली नाही, अशी अवस्था आहे. केवळ याच नव्हे तर शहरातील अन्य भागांतदेखील डासनिर्मितीची अनेक ठिकाणे आणि ब्लॅकस्पॉट असून, त्याकडे लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस