शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरातील विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:57 IST

नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात होळीनंतर उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर काही विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत अनेक विहिरींना तळ गाठल्याने वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच परिसरातील ६० ते ७० फुट खोल असलेल्या विहिरींचा पाझर पूर्णत: आटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने पशुपालक हताश झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने आगामी दोन महिने पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्च महिन्यातच विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. त्यामुळे शिवारातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहे. वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ