शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

धोंडेगावला विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:25 IST

नाशिक तालुक्यातील धोंडेगाव गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटल्याने दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील धोंडेगाव गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटल्याने दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते. पाणीपुरवठ्यासाठी गावात दोन विहिरी आहेत. मात्र त्या आटल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी शेताच्या विहिरींमधून अथवा कश्यपी धरणाला लागून असलेल्या नदीच्या कडेच्या विहिरीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे.गावात असलेल्या विहिरी व कूपनलिकेचे पाणी आटले असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या विहिरी किंवा कूपनलिकेला पाणी आहे, ते शेतकरी समाधानी आहेत. मात्र नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विहिरी तळ गाठण्यास सुरु वात झाल्याने पुढील परिस्थिती भयानक होऊ शकते. पर्यायी व्यवस्था म्हणून विहिरींना खाली खोल करून अथवा आडवी बोर मारून गावातील पाण्याची समस्या सोडविणे याचे प्रयत्न सर्व स्थरातून केले जात असल्याचे चित्र दिसते. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना निकामी होत चालल्याने ग्रामीण भागातील नागरिक, महिला हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करतांना दिसत आहेत. दुचाकी, सायकल, हातगाडी जीपगाडी जे साधन मिळेल त्याच्या साहाय्याने दूरवरून पाणी वाहून आणले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मिळेल तिथे काम करण्यासाठी जावे लागते. शेतात काम करणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, कारखान्यात काम करणे, चहाच्या गाडीवर काम करणे, हॉटेलात काम करणे, मिळेल त्याठिकाणी काम करणे अशी कामे करावी लागत असल्याने गावात ज्यादिवशी पाणी येते त्यादिवसाचे काम सोडून गावाकडे यावे लागते व पुरुष अथवा महिलेला आपल्या मजुरीवर पाणी सोडावे लागते. ग्रामीण भागातील पाण्याची पातळी खोल खोल जात असल्याने कूपनलिका, विहिरी खोदूनदेखील पाणी लागत नाही. अनेक नागरिकांनी कंटाळून याला पर्यायी व्यवस्था करण्याचा मार्ग अवलंबलेला आहे.पाण्यासाठी : नागरिकांचे हालधोंडेगाव ही ग्रुप ग्रामपंचायत असून, यामध्ये कश्यपनगर, खाद्याची वाडी अशी गावे जोडलेली आहेत. येथे वस्तीवर व गावात आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत ही सर्व कुटुंबे मोलमजुरीवर उदरनिर्वाह करतात, उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. दोन विहिरींवर गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यावर महिलांना स्वयंपाक, आंघोळ, धुणे-भांडी, पिण्यासाठी, जनावरांसाठी व्यवस्था करावी लागते. रखरखत्या उन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने विहिरींतील पाण्याची पातळी कधीही संपू शकते. समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वदूर पाण्याची वणवण करण्याची वेळ आली आहे. यामुळे परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी