शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कालिका देवी यात्रोत्सवात बॅरिकेड्सचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:48 IST

कालिका देवीचा यात्रोत्सव दुसऱ्या माळेला रंगात आलेला सोमवारी (दि.३०) पहावयास मिळाला. गडकरी चौक सिग्नल ते गुरुद्वारारोड कॉर्नरपर्यंत मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत, मात्र या बॅरिकेडमुळे भाविकांना अडथळा निर्माण होत असून ‘बॉटल नेक’ तयार होण्याचा धोका होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिक : कालिका देवीचा यात्रोत्सव दुसऱ्या माळेला रंगात आलेला सोमवारी (दि.३०) पहावयास मिळाला. गडकरी चौक सिग्नल ते गुरुद्वारारोड कॉर्नरपर्यंत मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत, मात्र या बॅरिकेडमुळे भाविकांना अडथळा निर्माण होत असून ‘बॉटल नेक’ तयार होण्याचा धोका होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.यात्रोत्सवानिमित्त भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले बॅरिकेड योग्य आहे. परंतु गडकरी चौकापासून तर थेट गुरुद्वारा रस्त्याच्या वळणापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने बॅरिकेड उभे करण्यात आले आहेत. ज्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूने गडकरी चौक ते थेट महामार्ग बसस्थानकाच्या दिशेने डाव्या बाजूने विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या मध्यभागीदेखील काही विक्रेत्यांनी दुकाने उभारल्याने भाविकांना मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. तसेच पोलिसांचे बॅरिकेडदेखील यादरम्यान लावले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.भाविकांची गर्दी अचानकपणे वाढल्यानंतर बॅरिकेडजवळ कोंडी निर्माण होऊ लागते त्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तातडीने रस्त्याच्या मध्यभागी लावलेले बॅरिकेड हटविण्याची मागणी होत आहे. मंदिराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान ‘देवदूत’ वाहनासह २४ तास सज्ज आहेत, मात्र या जवानांना निवाºयाचीदेखील कु ठलीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच दिवस-रात्र काढावी लागत आहे.गर्दीत वाढ; दर्शनासाठी रांगसोमवारी सकाळपासून शहरात कडक ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर अचानकपणे शहरात ढग दाटून आले आणि सरींचा वर्षावदेखील झाला. चार वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने यात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुन्हा हलक्या सरी कोसळल्याने काही वेळ यात्रेत तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मात्र या सरी अवघ्या काही मिनिटांतच थांबल्या. रात्री दहा वाजेपर्यंत यात्रोत्सव चांगलाच बहरला होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPoliceपोलिस