शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कालिका देवी यात्रोत्सवात बॅरिकेड्सचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:48 IST

कालिका देवीचा यात्रोत्सव दुसऱ्या माळेला रंगात आलेला सोमवारी (दि.३०) पहावयास मिळाला. गडकरी चौक सिग्नल ते गुरुद्वारारोड कॉर्नरपर्यंत मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत, मात्र या बॅरिकेडमुळे भाविकांना अडथळा निर्माण होत असून ‘बॉटल नेक’ तयार होण्याचा धोका होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिक : कालिका देवीचा यात्रोत्सव दुसऱ्या माळेला रंगात आलेला सोमवारी (दि.३०) पहावयास मिळाला. गडकरी चौक सिग्नल ते गुरुद्वारारोड कॉर्नरपर्यंत मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्याटप्प्यात बॅरिकेड लावण्यात आले आहेत, मात्र या बॅरिकेडमुळे भाविकांना अडथळा निर्माण होत असून ‘बॉटल नेक’ तयार होण्याचा धोका होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.यात्रोत्सवानिमित्त भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले बॅरिकेड योग्य आहे. परंतु गडकरी चौकापासून तर थेट गुरुद्वारा रस्त्याच्या वळणापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने बॅरिकेड उभे करण्यात आले आहेत. ज्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूने गडकरी चौक ते थेट महामार्ग बसस्थानकाच्या दिशेने डाव्या बाजूने विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच रस्त्याच्या मध्यभागीदेखील काही विक्रेत्यांनी दुकाने उभारल्याने भाविकांना मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. तसेच पोलिसांचे बॅरिकेडदेखील यादरम्यान लावले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.भाविकांची गर्दी अचानकपणे वाढल्यानंतर बॅरिकेडजवळ कोंडी निर्माण होऊ लागते त्यामुळे चेंगराचेंगरीचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तातडीने रस्त्याच्या मध्यभागी लावलेले बॅरिकेड हटविण्याची मागणी होत आहे. मंदिराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान ‘देवदूत’ वाहनासह २४ तास सज्ज आहेत, मात्र या जवानांना निवाºयाचीदेखील कु ठलीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच दिवस-रात्र काढावी लागत आहे.गर्दीत वाढ; दर्शनासाठी रांगसोमवारी सकाळपासून शहरात कडक ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर अचानकपणे शहरात ढग दाटून आले आणि सरींचा वर्षावदेखील झाला. चार वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने यात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुन्हा हलक्या सरी कोसळल्याने काही वेळ यात्रेत तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मात्र या सरी अवघ्या काही मिनिटांतच थांबल्या. रात्री दहा वाजेपर्यंत यात्रोत्सव चांगलाच बहरला होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPoliceपोलिस