शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

मालेगावच्या साबण कारखान्यांवर आणणार बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 21:57 IST

मालेगाव : चणकापूर धरणातील पाण्यावर मालेगावकरांचा १९७२ पासून हक्क आहे. तेथे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो; मात्र सध्या शहरात पाण्यावरून राजकारण केले जात आहे. चणकापूर व गिरणा धरणाचे पाणी शुद्ध आहे. येथील साबण कारखान्यांचे दूषित पाणी गिरणा नदीत सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होते. त्यासाठी साबण कारखाने बंद करण्याचा विषय महापालिकेच्या येत्या महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरशीद शेख : निवडणूक समोर ठेवून दगडफेकीचा प्रकार

मालेगाव : चणकापूर धरणातील पाण्यावर मालेगावकरांचा १९७२ पासून हक्क आहे. तेथे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो; मात्र सध्या शहरात पाण्यावरून राजकारण केले जात आहे. चणकापूर व गिरणा धरणाचे पाणी शुद्ध आहे. येथील साबण कारखान्यांचे दूषित पाणी गिरणा नदीत सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होते. त्यासाठी साबण कारखाने बंद करण्याचा विषय महापालिकेच्या येत्या महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.रशीद शेख यांनी सांगितले, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जुना आग्रा रस्त्याचे ९ कोटी रुपये खर्चून कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित अन्सार पत्रा डेपो ते देवीचा मळापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी येत्या शुक्रवारी (दि.२६) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत १० कोटींच्या निविदा प्रक्रिया तसेच कुसुंबा रोड कॉंक्रिटीकरणाच्या ७ कोटी रुपयांच्या निविदा असे एकूण १७ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. शहीद अब्दुल हमीद रोड (कुसुंबा रोड) हा अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यावर राजकारण केले जात आहे. दोन्ही रस्त्यांची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जातील, असेही माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.गुन्हे मागे घेण्याची मागणीत्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला बंद शहराच्या पूर्व भागात शंभर टक्के यशस्वी झाला होता; मात्र काही लोकांकडून व राजकारण्यांकडून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा प्रकार घडला आहे. २००१ साली झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती करण्याचा काही लोकांचा डाव होता; मात्र तो यशस्वी झाला नाही. शांतता बिघडविणारे मूठभर लोक आहे. त्यांनी शहरातून पलायन केले आहे. या घटनेत सर्वसामान्य घरचे तरुण अडकले आहेत. निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असेही शेख यांनी सांगितले.

टॅग्स :MalegaonमालेगांवHealthआरोग्य