शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:19 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक्यता असल्याने मिठाई विक्रेत्यांना मुदतबाह्य मिठाई विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत साळुंखे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक्यता असल्याने मिठाई विक्रेत्यांना मुदतबाह्य मिठाई विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत साळुंखे यांनी दिली आहे.कोरोना विषाणुमुळे उद््भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य त्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व दि. २३ पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू जसे, दूध, किराणा, भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.त्यामुळे सदर विक्री संचारबंदी कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवनासाठी वाटप करण्यात येऊ नये. सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद््भवेल अशी कृती कोणीही करू नये. असे करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असून, गुढीपाडव्यानिमित्त जनतेने बाहेरील मिठाईऐवजी घरी तयार केलेली मिठाईचे सेवन करावे, असे आवाहनही साळुंके यांनी केले आहे.विषबाधेची शक्यतामिठाई पदार्थ हे अत्यावश्यक व्यापारात मोडत नाहीत त्यामुळे हा व्यवसायही बंद आहे. त्यामुळे मिठाई उत्पादक व व्यापाऱ्यांकडे काही प्रमाणात मिठाई शिल्लक असू शकते. व्यापाऱ्यांकडून मिठाईची सर्वोत्तम दिनांकाची मुदत संपल्यानंतर विक्री होऊ शकते. बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या नाशवंत पदार्थापासून तयार करण्यात येते. मुदत बाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद््भवू शकतात.

टॅग्स :NashikनाशिकFDAएफडीए