शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नांदगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:43 IST

नांदगाव तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

ठळक मुद्देतालुक्यात वीस टक्के पाऊस : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नांदगाव : तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. शंंभरहून अधिक बैलगाड्यांपैकी अवघ्या पाचच बैलगाड्या कार्यालयाच्या आवारात आणण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता.यंदा वीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दहा टक्के पेरण्यादेखील धड होऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठी भीषणता निर्माण झालेल्या तालुक्यात दिलासा देणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचा आरोप मोर्चेकरी शेतकºयांनी केला. पाचच बैलगाड्या पाठवा अथवा पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन या अशी भूमिका स्वीकारणाºया प्रशासनाने नंतर नमते घेत संतप्त शेतकºयांचे निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी सकाळी शासकीय विश्रागृहाला बैलगाड्यांच्या तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तळवाडे, साकोरा, मूळ डोंगरी , जामदरी, नवे पांझण, हिंगणवाडी आदी पंचक्र ोशीतील शेतकºयांच्या बैलगाड्यांच्या गर्दीने विश्रामगृह फुलले होते. शेतकºयांच्या मोर्चाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार भारती सागरे यांनी सामोरे यावे, अशी विनंती करण्यात आली. आढेवेढे घेणाºया तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही असे आम्ही समजू, अशी भूमिका मोर्चाचे नेतृत्व करणारे सुभाष कुटे यांनी घेतल्यावर त्या निवेदन स्वीकारण्यासाठी आल्या. तहसीलवर निघालेला मोर्चा ही सुरु वात असून, आझाद मैदान ते मंत्रालयपर्यंत बैलगाड्यांचा असाच मोर्चा काढू व मंत्रालयाच्या दारात दुष्काळी भागातील बैल बांधू असा इशारा सुभाष कुटे यांनी दिला आहे.उपाययोजना कराव्याततालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करपलेल्या खरिपातील पिकांचे पंचनामे व्हावेत, प्राथमिक नजर आणेवारी लवकर घोषित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, टँकरच्या संख्येत वाढ करून तातडीने सुरू करावेत यासोबत दुष्काळसदृशतेवर दिलासादायक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी