शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.

लखमापूर : (बंडू खडांगळे)  दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.सध्या तालुक्यातील शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. रब्बी हंगामात घेतलेली पिके कोरोनामुळे लयास गेली. या हंगामात हाती असलेले भांडवल खर्च करून उत्तम पिके घेतली. परंतु बळीराजाच्या या जिवापाड कष्टाला कोरोना या साथीच्या रोगाची दृष्ट लागली.लाखमोलाची पिके कवडीमोल भावात विकावी लागली. रब्बी हंगाम संपला; पण शेवटपर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत शेतकरीवर्गाने आपल्याजवळील अल्पभांडवलातून व कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. समाधानकारक पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे बी उतरलेच नाही. तसेच शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे, सोसायट्यांचे तसेच अन्य मार्गाने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-------------------कांदा उत्पादकांना कोरोनाचा फटकाशेती भांडवल नगदी स्वरूपात मिळावे म्हणून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा व्यापारीवर्गाला न देता स्वत:च्या अथवा भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन भांडवलासाठी साठवण केली. आता सर्व लक्ष साठविलेल्या कांदा पिकावर केंद्रित करून त्या माध्यमातून तरी आपल्याला रोख स्वरूपात खेळते भांडवल उपलब्ध होईल.या आशेवर बळीराजा तग धरून बसला होता. परंतु कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे कांदा बाजारपेठेत नेल्यानंतर तो कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरीवर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे.शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरीवर्गाने दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. परंतु राज्यात लॉकडाऊनच्या स्थितीत हॉटेल व इतर व्यवसाय बंद पडल्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी विविध संघटनांनी अभिनव मार्गाने राग व्यक्त केला. शासनाने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया या अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नये, असे तालुक्यातील मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक