शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.

लखमापूर : (बंडू खडांगळे)  दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.सध्या तालुक्यातील शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. रब्बी हंगामात घेतलेली पिके कोरोनामुळे लयास गेली. या हंगामात हाती असलेले भांडवल खर्च करून उत्तम पिके घेतली. परंतु बळीराजाच्या या जिवापाड कष्टाला कोरोना या साथीच्या रोगाची दृष्ट लागली.लाखमोलाची पिके कवडीमोल भावात विकावी लागली. रब्बी हंगाम संपला; पण शेवटपर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत शेतकरीवर्गाने आपल्याजवळील अल्पभांडवलातून व कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. समाधानकारक पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे बी उतरलेच नाही. तसेच शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे, सोसायट्यांचे तसेच अन्य मार्गाने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-------------------कांदा उत्पादकांना कोरोनाचा फटकाशेती भांडवल नगदी स्वरूपात मिळावे म्हणून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा व्यापारीवर्गाला न देता स्वत:च्या अथवा भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन भांडवलासाठी साठवण केली. आता सर्व लक्ष साठविलेल्या कांदा पिकावर केंद्रित करून त्या माध्यमातून तरी आपल्याला रोख स्वरूपात खेळते भांडवल उपलब्ध होईल.या आशेवर बळीराजा तग धरून बसला होता. परंतु कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे कांदा बाजारपेठेत नेल्यानंतर तो कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरीवर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे.शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरीवर्गाने दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. परंतु राज्यात लॉकडाऊनच्या स्थितीत हॉटेल व इतर व्यवसाय बंद पडल्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी विविध संघटनांनी अभिनव मार्गाने राग व्यक्त केला. शासनाने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया या अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नये, असे तालुक्यातील मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक