शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.

लखमापूर : (बंडू खडांगळे)  दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.सध्या तालुक्यातील शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. रब्बी हंगामात घेतलेली पिके कोरोनामुळे लयास गेली. या हंगामात हाती असलेले भांडवल खर्च करून उत्तम पिके घेतली. परंतु बळीराजाच्या या जिवापाड कष्टाला कोरोना या साथीच्या रोगाची दृष्ट लागली.लाखमोलाची पिके कवडीमोल भावात विकावी लागली. रब्बी हंगाम संपला; पण शेवटपर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत शेतकरीवर्गाने आपल्याजवळील अल्पभांडवलातून व कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. समाधानकारक पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे बी उतरलेच नाही. तसेच शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे, सोसायट्यांचे तसेच अन्य मार्गाने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-------------------कांदा उत्पादकांना कोरोनाचा फटकाशेती भांडवल नगदी स्वरूपात मिळावे म्हणून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा व्यापारीवर्गाला न देता स्वत:च्या अथवा भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन भांडवलासाठी साठवण केली. आता सर्व लक्ष साठविलेल्या कांदा पिकावर केंद्रित करून त्या माध्यमातून तरी आपल्याला रोख स्वरूपात खेळते भांडवल उपलब्ध होईल.या आशेवर बळीराजा तग धरून बसला होता. परंतु कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे कांदा बाजारपेठेत नेल्यानंतर तो कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरीवर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे.शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरीवर्गाने दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. परंतु राज्यात लॉकडाऊनच्या स्थितीत हॉटेल व इतर व्यवसाय बंद पडल्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी विविध संघटनांनी अभिनव मार्गाने राग व्यक्त केला. शासनाने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया या अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नये, असे तालुक्यातील मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक