शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.

लखमापूर : (बंडू खडांगळे)  दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.सध्या तालुक्यातील शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. रब्बी हंगामात घेतलेली पिके कोरोनामुळे लयास गेली. या हंगामात हाती असलेले भांडवल खर्च करून उत्तम पिके घेतली. परंतु बळीराजाच्या या जिवापाड कष्टाला कोरोना या साथीच्या रोगाची दृष्ट लागली.लाखमोलाची पिके कवडीमोल भावात विकावी लागली. रब्बी हंगाम संपला; पण शेवटपर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत शेतकरीवर्गाने आपल्याजवळील अल्पभांडवलातून व कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. समाधानकारक पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे बी उतरलेच नाही. तसेच शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे, सोसायट्यांचे तसेच अन्य मार्गाने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-------------------कांदा उत्पादकांना कोरोनाचा फटकाशेती भांडवल नगदी स्वरूपात मिळावे म्हणून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा व्यापारीवर्गाला न देता स्वत:च्या अथवा भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन भांडवलासाठी साठवण केली. आता सर्व लक्ष साठविलेल्या कांदा पिकावर केंद्रित करून त्या माध्यमातून तरी आपल्याला रोख स्वरूपात खेळते भांडवल उपलब्ध होईल.या आशेवर बळीराजा तग धरून बसला होता. परंतु कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे कांदा बाजारपेठेत नेल्यानंतर तो कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरीवर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे.शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरीवर्गाने दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. परंतु राज्यात लॉकडाऊनच्या स्थितीत हॉटेल व इतर व्यवसाय बंद पडल्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी विविध संघटनांनी अभिनव मार्गाने राग व्यक्त केला. शासनाने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया या अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नये, असे तालुक्यातील मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक