शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यात कडधान्यासह तेलबिया पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:35 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देसूर्यफूल, तीळ, खुरासणीकडे पाठ : मका, बाजरीसह भुईमूग, सोयाबीन, मूग आदी पिकांना पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा तब्बल ६७ हजार ८३०.६० हेक्टर इतके सरासरी पेरणी क्षेत्र असून त्यांच्यात कडधान्य आणि तेलबिया पेराक्षेत्रात सरासरी तीन ते चार पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा तेलबिया आणि कडधान्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे.बागलाण तालुक्यात सलग कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे गेल्या वर्षी खरिपाच्या पेराक्षेत्रात घट होऊन ३६ हजार ८४८ इतके सरासरी पेराक्षेत्र होते. पाऊस लांबल्याने आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक हातातून गेले. यंदा मात्र चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व त्यानंतर मान्सूनचे झालेले दमदार आगमन यामुळे खरीप हंगाम जोमात आहे.रासायनिक खतांचा तुटवडा...तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यास कृषी विभागानेदेखील दुजोरा दिला आहे. युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे १५:१५:१५ ही रासायनिक खतेदेखील कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वेळेवर खते उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. कडधान्य उत्पादन वाढणारतालुक्यात यंदा कडधान्य पेराच्या सरासरी क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी ९0९ हेक्टर इतकेच पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ५ हजार ७१९ हेक्टर इतके सरासरी पेराक्षेत्र असून सर्वाधिक मूग पेºयाकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. मूगापाठोपाठ तूर, उडीद, कुळीथ या पिकांकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. १६ जूनअखेर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८५४.६0 हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे.तृणधान्याचा पेरा ५२%तालुक्यात जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे मका आणि बाजरी पिकाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, अंतापूर, वीरगाव करंजाड, निताणे, मुंजवाड, डांगसौंदाणे, किकवारी, आराई, ब्राह्मणगाव, लखमापूर आदी परिसरात मक्याच्या सरासरी ३४ हजार ८५९ हेक्टर पेराक्षेत्रापैकी २२ हजार १९५.७0 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे, तर बाजरीच्या १९ हजार ८५१ हेक्टर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८ हजार ७४.८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी मात्र दुर्मीळच असून, फक्त १३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.तेलबियांकडे शेतकºयांचा कलबागलाण ८0 आणि ९0 च्या दशकात तेलबिया उत्पादनातदेखील अव्वल होता. मात्र वारंवार घेतले जात असलेले उत्पादन यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन घटल्याने शेतकºयांनी या पिकांकडे पाठ फिरवली होती. गेल्या वर्षी फक्त ९0३ हेक्टर एवढेच सरासरी तेलबिया पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ३६0४ हेक्टर सरासरी पेराक्षेत्र असून, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे १६ जूनअखेरपर्यंत १४३४.९0 हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला आहे. मोसम, आराम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांमुळे संपूर्ण परिसर सुपीक आहे. त्यामुळे मोसम, आरम, करंजाडी खोºयात तृणधान्य, तेलबिया आणि कडधान्य पेराक्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टा हे भाताचे आगार मानले जाते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भाताच्या क्षेत्रात घट होत चालली आहे. गेल्या वर्षी भात लावडीचे सरासरी क्षेत्र १३७७ हेक्टर होते. यंदा त्याच्या वाढ होऊन २0३१.६0 हेक्टर सरासरी भात लागवडीचे क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी