शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बागलाण तालुक्यात कडधान्यासह तेलबिया पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:35 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देसूर्यफूल, तीळ, खुरासणीकडे पाठ : मका, बाजरीसह भुईमूग, सोयाबीन, मूग आदी पिकांना पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा तब्बल ६७ हजार ८३०.६० हेक्टर इतके सरासरी पेरणी क्षेत्र असून त्यांच्यात कडधान्य आणि तेलबिया पेराक्षेत्रात सरासरी तीन ते चार पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा तेलबिया आणि कडधान्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे.बागलाण तालुक्यात सलग कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे गेल्या वर्षी खरिपाच्या पेराक्षेत्रात घट होऊन ३६ हजार ८४८ इतके सरासरी पेराक्षेत्र होते. पाऊस लांबल्याने आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक हातातून गेले. यंदा मात्र चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व त्यानंतर मान्सूनचे झालेले दमदार आगमन यामुळे खरीप हंगाम जोमात आहे.रासायनिक खतांचा तुटवडा...तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यास कृषी विभागानेदेखील दुजोरा दिला आहे. युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे १५:१५:१५ ही रासायनिक खतेदेखील कमी प्रमाणात उपलब्ध आहे. वेळेवर खते उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. कडधान्य उत्पादन वाढणारतालुक्यात यंदा कडधान्य पेराच्या सरासरी क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी ९0९ हेक्टर इतकेच पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ५ हजार ७१९ हेक्टर इतके सरासरी पेराक्षेत्र असून सर्वाधिक मूग पेºयाकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. मूगापाठोपाठ तूर, उडीद, कुळीथ या पिकांकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे. १६ जूनअखेर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८५४.६0 हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे.तृणधान्याचा पेरा ५२%तालुक्यात जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे मका आणि बाजरी पिकाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, अंतापूर, वीरगाव करंजाड, निताणे, मुंजवाड, डांगसौंदाणे, किकवारी, आराई, ब्राह्मणगाव, लखमापूर आदी परिसरात मक्याच्या सरासरी ३४ हजार ८५९ हेक्टर पेराक्षेत्रापैकी २२ हजार १९५.७0 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे, तर बाजरीच्या १९ हजार ८५१ हेक्टर सरासरी पेराक्षेत्रापैकी ८ हजार ७४.८0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी मात्र दुर्मीळच असून, फक्त १३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.तेलबियांकडे शेतकºयांचा कलबागलाण ८0 आणि ९0 च्या दशकात तेलबिया उत्पादनातदेखील अव्वल होता. मात्र वारंवार घेतले जात असलेले उत्पादन यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन घटल्याने शेतकºयांनी या पिकांकडे पाठ फिरवली होती. गेल्या वर्षी फक्त ९0३ हेक्टर एवढेच सरासरी तेलबिया पेराक्षेत्र होते. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ३६0४ हेक्टर सरासरी पेराक्षेत्र असून, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे १६ जूनअखेरपर्यंत १४३४.९0 हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला आहे. मोसम, आराम, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांमुळे संपूर्ण परिसर सुपीक आहे. त्यामुळे मोसम, आरम, करंजाडी खोºयात तृणधान्य, तेलबिया आणि कडधान्य पेराक्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टा हे भाताचे आगार मानले जाते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भाताच्या क्षेत्रात घट होत चालली आहे. गेल्या वर्षी भात लावडीचे सरासरी क्षेत्र १३७७ हेक्टर होते. यंदा त्याच्या वाढ होऊन २0३१.६0 हेक्टर सरासरी भात लागवडीचे क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी