शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:10 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देकोळपणी, फवारणी, बिजे अंकुरली तर कुठे पेरणी खोळंबली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.पावसावर अवलंबून असलेल्या उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली पण पंधरा ते वीस दिवस पाऊस उघडल्याने या भागातही कुठे बियाणे उतरले, तर कुठे उतरलेच नाही. पण गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले तर कुठे दुबार पेरणी केली, त्यामुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली असली तरी पश्चिम भागातील साताळी, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, भिंगारे, मुखेड परिसर, नेऊरगाव परिसरात अजूनही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जसजसे दिवस वाढत चालले आहेत तस तसे शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून पुढील कांदा पिक शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्याने अनेक शेतकरी मका ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहे, कारण मका पिकाला कालावधी जास्त लागत असल्याने व पेरणी लेट होत असल्यामुळे पुढे उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी सोयाबीन पिकाकडे कल दिसत आहे.पिक कामे खोळंबलीकृषी विभागाने एक फुट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार झालेल्या पावसावर पेरणी केली. पण काही दिवसांपासुन पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओल संपुष्टात आल्याने पिक कामे खोळंबली आहेत.गावागावातील पिकांमध्ये फरकपाऊसही लपंडाव खेळत असल्याने एका गावात बरसतो तर दुसऱ्या गावात वाट बघायला लावतो, अशी परिस्थिती पावसाची झाली असून पिकांमध्ये ही फरक पडला असून एका गावात पिके कोळपणीला आली, तर दुसऱ्या गावात बिजे अंकरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने धरसोड केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मुखेड गटात पावसाची प्रतीक्षायेवला पश्चिम भागातील चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, भिंगारे, मुखेड, नेऊरगाव परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.हवामान अंदाजविश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे राज्यात ठिकठिकाणी ६ जुलै पासून पावसाला सुरवात होईल व ७ ते ११ तारखेदरम्यान राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. १२ ते १७ काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस १८ तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल. दर वर्षी जुलै महिन्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होईल.-पंजाब डख, हवामान अभ्यासक. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस