शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:10 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देकोळपणी, फवारणी, बिजे अंकुरली तर कुठे पेरणी खोळंबली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.पावसावर अवलंबून असलेल्या उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली पण पंधरा ते वीस दिवस पाऊस उघडल्याने या भागातही कुठे बियाणे उतरले, तर कुठे उतरलेच नाही. पण गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले तर कुठे दुबार पेरणी केली, त्यामुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली असली तरी पश्चिम भागातील साताळी, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, भिंगारे, मुखेड परिसर, नेऊरगाव परिसरात अजूनही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जसजसे दिवस वाढत चालले आहेत तस तसे शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून पुढील कांदा पिक शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्याने अनेक शेतकरी मका ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहे, कारण मका पिकाला कालावधी जास्त लागत असल्याने व पेरणी लेट होत असल्यामुळे पुढे उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी सोयाबीन पिकाकडे कल दिसत आहे.पिक कामे खोळंबलीकृषी विभागाने एक फुट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार झालेल्या पावसावर पेरणी केली. पण काही दिवसांपासुन पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओल संपुष्टात आल्याने पिक कामे खोळंबली आहेत.गावागावातील पिकांमध्ये फरकपाऊसही लपंडाव खेळत असल्याने एका गावात बरसतो तर दुसऱ्या गावात वाट बघायला लावतो, अशी परिस्थिती पावसाची झाली असून पिकांमध्ये ही फरक पडला असून एका गावात पिके कोळपणीला आली, तर दुसऱ्या गावात बिजे अंकरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने धरसोड केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मुखेड गटात पावसाची प्रतीक्षायेवला पश्चिम भागातील चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, भिंगारे, मुखेड, नेऊरगाव परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.हवामान अंदाजविश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे राज्यात ठिकठिकाणी ६ जुलै पासून पावसाला सुरवात होईल व ७ ते ११ तारखेदरम्यान राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. १२ ते १७ काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस १८ तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल. दर वर्षी जुलै महिन्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होईल.-पंजाब डख, हवामान अभ्यासक. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस