शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

येवला तालुक्यात खरिपाचे बिघडले गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:10 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देकोळपणी, फवारणी, बिजे अंकुरली तर कुठे पेरणी खोळंबली

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार ५१ हजार ७४३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे पण या वर्षी मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे गणित बिघडले असून तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात खरिप पिकाची कोळपणी, औषधे फवारणी सुरू आहे तर पश्चिम भागात मात्र कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे वरुणराजाने गणित बिघडले आहे.पावसावर अवलंबून असलेल्या उत्तर-पूर्व भागात सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली पण पंधरा ते वीस दिवस पाऊस उघडल्याने या भागातही कुठे बियाणे उतरले, तर कुठे उतरलेच नाही. पण गेल्या दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले तर कुठे दुबार पेरणी केली, त्यामुळे शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली असली तरी पश्चिम भागातील साताळी, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, भिंगारे, मुखेड परिसर, नेऊरगाव परिसरात अजूनही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जसजसे दिवस वाढत चालले आहेत तस तसे शेतकरी पिकांमध्ये बदल करत असून पुढील कांदा पिक शेतकऱ्यांना महत्त्वाचे असल्याने अनेक शेतकरी मका ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहे, कारण मका पिकाला कालावधी जास्त लागत असल्याने व पेरणी लेट होत असल्यामुळे पुढे उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी सोयाबीन पिकाकडे कल दिसत आहे.पिक कामे खोळंबलीकृषी विभागाने एक फुट ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार झालेल्या पावसावर पेरणी केली. पण काही दिवसांपासुन पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओल संपुष्टात आल्याने पिक कामे खोळंबली आहेत.गावागावातील पिकांमध्ये फरकपाऊसही लपंडाव खेळत असल्याने एका गावात बरसतो तर दुसऱ्या गावात वाट बघायला लावतो, अशी परिस्थिती पावसाची झाली असून पिकांमध्ये ही फरक पडला असून एका गावात पिके कोळपणीला आली, तर दुसऱ्या गावात बिजे अंकरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाने धरसोड केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.मुखेड गटात पावसाची प्रतीक्षायेवला पश्चिम भागातील चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, भिंगारे, मुखेड, नेऊरगाव परिसरात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.हवामान अंदाजविश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे राज्यात ठिकठिकाणी ६ जुलै पासून पावसाला सुरवात होईल व ७ ते ११ तारखेदरम्यान राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. १२ ते १७ काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस १८ तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे. या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल. दर वर्षी जुलै महिन्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होईल.-पंजाब डख, हवामान अभ्यासक. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस