शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

बोंडअळी अनुदानासाठीचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:55 AM

येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.

ठळक मुद्देयेवला तालुका : निधी देण्याचे प्रांताधिकाऱ्यांकडून आश्वासन

येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.गुलाबी बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ गावांतील अनुदानाचे तातडीने वाटप करावे, यासाठी तहसील कार्यालयासमोर हितेश दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, संभाजी कदम, अशोक दाभाडे, गुलाब दाभाडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रोशन खांबकर, राजेंद्र दाभाडे, माणिक दाभाडे, बबन घोडेराव, कमलेश दाभाडे, पोपट दाभाडे, विलास दाभाडे, जालिंदर दाभाडे, सोपान साळवे, राहुल लासुरे, सोमनाथ कदम, अरु ण जाधव, बाळासाहेब गायकवाड आदींसह ४० शेतकºयांनी उपोषण सुरू केले होते. या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करून निधी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठीची प्रक्रि या तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले. या आशयाचे पत्र तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी दिले. या उपोषणास तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.निधी खात्यावर वर्ग करातालुक्यातील ९७ गावांना आजपर्यंत अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र, तालुक्यातील पूर्वभागातील बोकटे गावासह २५ गावांतील शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २५ गावे मिळून ३ कोटी ३७ लाख ५८ हजार ६०१ रु पयांचा निधी अजून शासनाकडून मिळालेला नाही. तो निधी तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.