शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

शिक्षण खाते फटाक्यांच्या दुष्परिणामांची जागृती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 23:17 IST

वरातीमागून घोडे : आॅक्टोबरच्या आदेशाची जानेवारीत अंमलबजावणी

नाशिक : दिवाळीत फटाक्यांचे होणारे दुष्परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये तातडीने जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी दिले खरे; मात्र दिवाळी झाल्यानंतर आता राज्य शासनाने गेल्या आठवड्यात परिपत्रक काढले असून, शाळांनी काय करावे याचे निर्देश दिल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार घडला आहे. शासनाचा हा संथगती कारभार की पुढील दिवाळीसाठी ही आगाऊ दक्षता, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.दिवाळीत वाजणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याविषयी पर्यावरणप्रेमी ओरड करीत असतात. अशाच प्रकारे प्रदूषणाबाबत जागरूक असलेल्या अर्जुन गोपाल आणि अन्य काही पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. त्या आधारे सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १६ आॅक्टोबर रोजी केंद्र शासनाने सर्व राज्य शासनांना फटाक्यांच्या अपायकारकतेविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अध्यापकांमार्फत जागृती करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला जानेवारी महिना उजाडावा लागला आहे. राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले असून, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सर्व शाळांमध्ये फटाक्यांबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.