शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दुष्काळ अनुदानाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:03 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा सावळा गोंधळ : तहसीलदारांकडे तक्र ारी करूनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.गतवर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. या दुष्काळाची सर्वात जास्त झळ सिन्नर तालुक्याला बसली. दरम्यान २०१८-१९ या आर्थिक वर्षातील दुष्काळी भागातील शेतºयांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर झालेल्या गावांतील शेतकºयांना खरीप आणि रब्बीसाठी हेक्टरी सात तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे संबंधित गावांचा निधी दिला होता. निधी वाटप सुरू असताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ निधीचे वाटप थांबविण्यात आले होते. निवडणुकीनंतर पुन्हा वाटप सुरू करण्यात आले.मात्र, सर्वत्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तालु्क्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना अद्यापही दुष्काळी अनुदान प्राप्त झालेले नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी आल्यानंतर ग्रामंचायतीच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना सबंधित निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र देण्यात आले होते. तसेच कामगार तलाठी यांच्याकडे सर्व खातेदार शेतकºयांची माहिती जमा करण्यात आली आहे, मात्र तरीदेखील संबंधित शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप सरपंच लता कारले, भाऊसाहेब जाधव यांनी केला आहे. महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत असून, अनुदान खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अन्यथा सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.वर्ष उलटूनदेखील लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना सन २०१८-१९ वर्षाचे दुष्काळी अनुदान अद्याप मिळालेले नाही. याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता शासनाकडून आलेले अनुदान संपले असल्याचे तोंडी उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, प्रत्येक गावातील शेतकºयांच्या यादीप्रमाणे शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान काही गावांना वाटप न करताच संपले कसे?, यावरून महसूल विभाग दुष्काळाचा सामना केलेल्या शेतकºयांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.- भाऊसाहेब जाधव, उपसरपंच, लक्ष्मणपूर

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी