शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अवनखेड ग्रामपंचायत राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 01:57 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, गुरुवारी (दि. १) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदुष्यप्रणालीद्वारे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआज पुरस्कार वितरण : चार वर्षांनंतर निकाल जाहीर

नाशिक : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, गुरुवारी (दि. १) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदुष्यप्रणालीद्वारे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्यावतीने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. या अभियानाला स्वच्छ भारत अभियानाची जोड मिळाल्याने गाव हगणदारीमुक्त झाली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुद्धता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन २०१७-२०१८ च्या पुरस्कारासाठी रात्यस्तरीय तपासणी समितीकडून अवनखेड ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली. यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयंपुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येऊन या निकषाच्या आधारे ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.

चौकट==

अन्य गावांनीही आदर्श घ्यावा

लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी सहभाग घेऊन ग्रामविकासाचा पाया मजबूत केला असून, जिल्ह्यातील अन्य गावांनी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.

- बाळासाहेब क्षीरसागर

------

ग्रामपंचायतींना कामाची संधी

पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन आणि लोकसहभाग या चतु:सुत्रीप्रमाणे गावाने एकजुटीने काम केल्यास आदर्श गावाकडे वाटचाल करण्याची क्षमता सर्व ग्रामपंचायतीकडे असून, यामध्ये उत्कृष्ट काम करण्याची संधी आहे.

- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी.

----------

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार