शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उमराणे बाजार समितीत दुसर्या दिवशीही कांद्याचे लिलाव बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:19 IST

उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

ठळक मुद्देउमराणे : निर्णय न झाल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी

उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत जवळपास सर्वच कांदा व्यापार्यांकडे शंभर ते दिडशे टन कांदा शेडमध्ये पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होणार नसल्याची भुमिका घेतल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.परंतु अद्यापही काही व्यापार्यांच्या माल निकाशी न झाल्याने शिवाय माल साठवणुक निर्बंध निर्णयावर तोडगा न निघाल्याने आज दुसर्या दिवशीही ( मंगळवार दि.२७ ) येथील लिलाव ठप्पच होते. परिणामी एकीकडे काही प्रमाणात शिल्लक असलेला उन्हाळी कांदा खराब होत असतानाच कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाकडून निर्यातबंदी, कांदा आयात, प्राप्तीकर विभागाकडून चौकशी, माल साठवणुकीवर निर्बंध आदी अडचणी निर्माण करुन व्यापार्यांसह शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.

शासनाने योग्य तो तोडगा काढुन बाजार समितीतील लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात येत आहे. @ प्रतिक्रिया - गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे चाळीत साठवणुक केलेला कांदा पुर्णतः खराब झाल्याने सद्यस्थितीत अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. व त्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे.त्यामुळे माल विक्री करणे नितांत गरजेचे असताना शासनाने माल साठवणुकीवर निर्बंध लादून व्यापार्यांबरोबर शेतकर्यांनाही वेठीस धरले आहे.

संभाजी देवरे ( शेतकरी ). @ शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने व्यापार्यांकडे आजमितीस शंकर ते दिडशे टन कांदा पडुन आहे. शिवाय जेथे माल पाठवायचा आहे तेथेही माल पडुन असल्याने मागणीत घट आली असुन कांद्याचे बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध मागे घ्यावेत किंवा किमान शंभर टनापर्यंत मर्यादा वाढवुन द्यावी.

- संजय खंडेराव देवरे ( कांदा व्यापारी )

 

 

 

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड