शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘प्लॅस्टिक वादा’वरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:38 IST

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला.

पंचवटी : प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला. शेतमाल भरण्यासाठी व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्याविरुद्ध महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केल्याने शनिवारी दुपारी जवळपास तासभर लिलाव बंद पडले. अखेर व्यापाºयांनी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरण्यास सुरुवात केल्यानंतर लिलाव सुरळीतपणे चालू झाले.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातून दैनंदिन शेकडो शेतकरी शेतमाल प्लॅस्टिक कॅरेटमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. लिलाव झाल्यानंतर व्यापारी फळभाज्या वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून तो चारचाकी वाहनांतून अन्य बाजारपेठेत पाठवित असतात. शासनाने प्लॅस्टिकबंदी लागू करून प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्यास जागेवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शेतमाल भरायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  शनिवारी सकाळी बाजार समितीत काही व्यापाºयांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर दुपारी १२ वाजता सुरू होणारी लिलाव प्रक्रिया रखडली. यामुळे व्यापारी हतबल झाले. त्यानंतर तासभराने पुन्हा लिलाव सुरू झाले.व्यापा-यांनी मांडल्या अडचणीलिलाव झाल्यानंतर रिकामे कॅरेट शेतकºयांना परत करावे लागत असल्याने फळभाज्या कशात भरून पाठवायच्या यावरून व्यापारी हतबल झाले. त्यानंतर काही व्यापाºयांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन अडचणी मांडल्या; मात्र शासन निर्णय असल्याने व त्यातच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने कोणी काही करू शकत नाही असे स्पष्ट केल्याने व्यापारी मागे फिरले त्यानंतर तासभराने म्हणजे दुपारी १ वाजता लिलाव सुरू झाले. प्लॅस्टिकबंदीमुळे व्यापाºयांनी प्लॅस्टिक पिशव्याऐवजी पोते तसेच पुठ्ठ्याच्या कार्टूनमध्ये शेतमाल भरून अन्य बाजार समितीत रवाना केला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी