शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शांतता समितीच्या बैठकीला प्रथमच अपर महासंचालकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:20 IST

आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.

ठळक मुद्देसाधला नागरिकांशी संवाद

नाशिक : आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.आगामी दोन महिने होणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने शुक्र वारी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सरंगल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरंगल यांनी शहरातील शांतता कायम असल्याचे नमूद केले.सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, क्र ाइम ब्रँच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बडेकर, शांतता कमिटी सदस्य अशोक पंजाबी, मधुकर भालेराव, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवे, बिलाल खतीब, शंकर बर्वे, शरयू डांगळे, अंजली शिंदे, नगरसेविका समिना मेमन, वसीम पिरजादे, एजाज मकराणी, शहर ए काजी सय्यद मोनुद्दीन, एजाज काजी, शोकत सय्यद आदी शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. गत तीन दिवसांपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पाहणीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सरंगल दौºयावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये येऊन तेथील गुन्हयांच्या संदर्भात माहिती घेऊन पोलीस स्टेशनची पाहणी केली.गुन्हेगारांचा छडा लावण्यास यशपोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी शहरातील सुव्यवस्था कायम असून, मुथूट फायनान्ससारख्या गुन्ह्याचा व संबंधित गुन्हेगारांचा छडा लावण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासह अन्य कोणतीही माठी दुर्घटना घडली नसल्याचे त्यांनी नमूद केले, तर नागरिकांनी सरंगल पोलीस आयुक्त असताना शहरात सुरू केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन, आॅलआउट यांसारख्या योजना विद्यमान पोलीस आयुक्तांनीदेखील कायम ठेवल्या असल्याबाबत बहुतांश नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे