शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

शांतता समितीच्या बैठकीला प्रथमच अपर महासंचालकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:20 IST

आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.

ठळक मुद्देसाधला नागरिकांशी संवाद

नाशिक : आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी केले. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रथमच अपर पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहिल्याने या बाबीचेच नागरिकांना विशेष कौतुक वाटले.आगामी दोन महिने होणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने शुक्र वारी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सरंगल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरंगल यांनी शहरातील शांतता कायम असल्याचे नमूद केले.सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, क्र ाइम ब्रँच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बडेकर, शांतता कमिटी सदस्य अशोक पंजाबी, मधुकर भालेराव, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवे, बिलाल खतीब, शंकर बर्वे, शरयू डांगळे, अंजली शिंदे, नगरसेविका समिना मेमन, वसीम पिरजादे, एजाज मकराणी, शहर ए काजी सय्यद मोनुद्दीन, एजाज काजी, शोकत सय्यद आदी शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. गत तीन दिवसांपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या पाहणीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सरंगल दौºयावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये येऊन तेथील गुन्हयांच्या संदर्भात माहिती घेऊन पोलीस स्टेशनची पाहणी केली.गुन्हेगारांचा छडा लावण्यास यशपोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी शहरातील सुव्यवस्था कायम असून, मुथूट फायनान्ससारख्या गुन्ह्याचा व संबंधित गुन्हेगारांचा छडा लावण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासह अन्य कोणतीही माठी दुर्घटना घडली नसल्याचे त्यांनी नमूद केले, तर नागरिकांनी सरंगल पोलीस आयुक्त असताना शहरात सुरू केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन, आॅलआउट यांसारख्या योजना विद्यमान पोलीस आयुक्तांनीदेखील कायम ठेवल्या असल्याबाबत बहुतांश नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे