शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य

By admin | Updated: May 5, 2015 01:37 IST

दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य

नाशिक : काही वर्षांपूर्वी असाध्य असणारा दमा (अस्थमा) आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य ठरू लागला आहे. अधिक काळपर्यंत प्रभावी ठरू शकणारी औषधे गेल्या वर्षभरात बाजारात दाखल झाली आहेत. तथापि, सततच्या वाढणाऱ्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. भल्याभल्यांची गाळण उडवणारा दमा हा आजार नियंत्रणात आणणे, हे पूर्वी अत्यंत जिकिरीचे काम होते. श्वास घेण्यास त्रास होणे, बोलताना धाप लागणे ही दम्याची लक्षणे. याचे पर्यावसान दम्याचा अटॅक येण्यापर्यंत होऊ शकते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अ‍ॅलर्जी असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे, सतत औषधे घेत राहणे, हाच उपाय होता. दम्यासाठी औषधे उपलब्ध होती; मात्र ती वारंवार घ्यावी लागत होती. गेल्या काही वर्षांत मात्र दम्यावर नियंत्रण ठेवू शकणारी अत्याधुनिक औषधे बाजारात उपलब्ध झाली आहेत. या औषधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा लाभतो आहे. ‘स्प्रे’चा प्रभाव २४ तास दम्याच्या रुग्णांसाठी पूर्वी उपलब्ध असलेले स्प्रे किंवा पंप हे दर ४ किंवा ६ तासांनी पुन:पुन्हा घ्यावे लागत असत. त्यामुळे घराबाहेर पडताना, कार्यालयीन कामाच्या ठिकाणीही ते खिशात बाळगावे लागत असत. आता मात्र या स्प्रेच्या प्रभावाचा कालावधी १२ ते २४ तासांपर्यंत वाढला आहे. याशिवाय त्यांचा आकारही लहान झाला असून, त्यांच्यात आता महिनाभराचे औषध मावते. (प्रतिनिधी)