शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘त्यांच्या’ घरी जाऊन जाब विचारा : मधुकर पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:32 IST

पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा,

नाशिक : पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा, असा सल्ला माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी (दि़ २५) नाशिकममधील पत्रकार परिषदेत धनगर समाजाला दिला़ आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यास आपला विरोध नसून कार्यालयावरील निंदनीय हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणीही पिचड यांनी यावेळी केली़  पिचड यांनी सांगितले की, गत पन्नास वर्षांपासून आदिवासींसंबंधी काम करणाऱ्या पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गौरविलेले आहे़ शुक्रवारी (दि़ २४) काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संस्थेच्या कार्यालयात घुसून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली तोडफोड केली़ या संस्थेचे संचालक कै. डॉ़ गोविंद गारे यांनी संस्थेच्या नावारूपासाठी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमातीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, राहणीमान, शेती कामाची पद्धत यावर संशोधन केलेले आहे़ या कार्यालयावरील हल्ला हा दुर्दैवी अन् निषेधार्ह असून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे़  भाजपा सरकारच्या कार्यकाळात आदिवासींचा एकही प्रश्न सुटलेला नाही़ सरकारची आदिवासींचे प्रश्न सोडविण्याची पद्धत चुकीची असून, याबाबत गत आठवड्यात आदिवासी समाजाचे सर्व आमदार व खासदार यांनी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना आदिवासींच्या प्रश्नांबाबत माहिती दिली़गोंड आणि राजभोर या दोन जातींना केवळ त्यांच्यामध्ये स्वल्पविराम नसल्याने त्यांना सवलत मिळत नव्हती, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागली़ धनगड ही एक देशातील एक जात असून, ती ओडिसा, बिहार झारखंड या राज्यात आहे़ या ठिकाणी टाटांनी सर्वेक्षण केले असून, त्यांचा तो अहवाल प्रलंबित आहे़ धनगरांची वेगळी जात असून, स्पेलिंग मिस्टेक असू शकत नाही तसेच संशोधनातून ते समोर येईल़  आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटीची योजना नको असून, सरकारने हा वेडेपणाचा निर्णय बदलण्याची गरज आहे़ धनगरांना आदिवासींमध्ये घालू नये, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने हवे तेवढे, हवे त्यांना आरक्षण द्यावे त्यास विरोध नसल्याचे पिचड यांनी सांगितले़टाटा कंपनी सुरू असलेले सर्वेक्षण आदिवासी समाजाला मान्य नाही़ मुळात टाटा हे धंदेवाईक आहेत, त्यांना काय आदिवासी माहिती? आदिवासींची राहणी, पद्धती याच्या सर्वेक्षणाबाबत काय माहिती आहे ? त्यामुळेच आदिवासींची माहिती असणाºया आदिवासी संशोधन संस्था महाराष्ट्रात, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात येथे असून, महाराष्ट्राच्या संस्थेकडून सर्वेक्षण नको असेल तर गुजरातच्या संस्थेकडून सर्वेक्षणाचे काम करून घ्या, टाटाकडून का? असा सवाल पिचड यांनी विचारला आहे़

टॅग्स :Madhukar Pichadमधुकर पिचडNashikनाशिक