शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अंबोली धरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:44 AM

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली.आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात शिकणारी दोन मुले धरणाजवळ गेल्याने तोल जाऊन पाण्यात पडले. घटनेचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांसमवेत सहलीला आलेल्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी धरणात उड्या घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविले असता यातील रोशन उत्तम लाखन (८, रा. नांदगाव कोहळी) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अंबोली गावातील आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, यासाठी शिक्षकांनी सहल अंबोली धरणाच्या परिसरात आयोजित केली होती. येथे वनभोजनाचा आस्वाद घेत असतानाच रोशन आणि उत्तम विलास धोंगडे (८, रा. वरसविहीर) हे दोघे धरणाजवळ गेले. तोल गेल्याने दोघेही पाण्यात पडले. मुलांच्या ओरडण््याचा आवाज आल्याने आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाजवळ धाव घेतली. यावेळी काही कर्मचाºयांनी धरणात उड्या घेतल्या. अवघ्या काही मिनिटांतच कर्मचाºयांनी रोशन व उत्तम या दोघांना पाण्यातून बाहेर काढले, मात्र रोशनचा मृत्यू झाला, तर उत्तमचे दैव बलवत्तर असल्याने तो वाचला. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी