शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: September 22, 2015 22:31 IST

जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईची समस्या

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना नियोजनाअभावी कोलमडली आहे. परिणामी दोन महिन्यांपासून जायगावला कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा जायगाव येथील कर्मचाऱ्याची सिंहस्थ कुंभमेळ्यासाठंी नाशिक येथे नेमणूक झाल्याचे समजते. तथापि, जायगाव येथे पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. कर्मचारीच नसल्याने मीटर रिडिंग घेण्यासाठी कोणीही कर्मचारी येत नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणींत भर पडली आहे.देशवंडी येथील पाणीपुरवठा कर्मचारी आठवड्यातून एकदा येऊन पाणीपुरवठा करत होता; मात्र, काही दिवसांपूर्वी योजनेची जलवाहिनी फुटली असून, कर्मचाऱ्यांअभावी तिची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईसह पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व जायगाव येथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)