शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: September 22, 2015 22:31 IST

जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईची समस्या

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना नियोजनाअभावी कोलमडली आहे. परिणामी दोन महिन्यांपासून जायगावला कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा जायगाव येथील कर्मचाऱ्याची सिंहस्थ कुंभमेळ्यासाठंी नाशिक येथे नेमणूक झाल्याचे समजते. तथापि, जायगाव येथे पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. कर्मचारीच नसल्याने मीटर रिडिंग घेण्यासाठी कोणीही कर्मचारी येत नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणींत भर पडली आहे.देशवंडी येथील पाणीपुरवठा कर्मचारी आठवड्यातून एकदा येऊन पाणीपुरवठा करत होता; मात्र, काही दिवसांपूर्वी योजनेची जलवाहिनी फुटली असून, कर्मचाऱ्यांअभावी तिची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईसह पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व जायगाव येथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)