शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

वन्य जीवांच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:36 IST

सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. परिणामी पशू-पक्ष्यांची भटकंती होत आहे. हे पाहून वनविभागाकडून चार गावांत २० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्यप्राण्यांच्या पाणी सुविधेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे.

गत पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यातील पाटोळे, खोपडी, मिठसागरे, वावी येथे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दहा प्लॅस्टिक ड्रम कापून त्याचे पाणवठे तयार करण्यात येऊन वन्यप्राण्यांचा राबता असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना या सुविधेचा लाभ होतानाचे चित्र आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था करण्यात आली. डिसेंबर महिन्यापासून जंगलातील पाणीसाठे कमी पडू लागले होते. मार्च महिन्यात बहुतांश गावांतील पाणीसाठा कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांनी वस्त्यांकडे धाव घेतली. पाण्याच्या शोधार्थ भटकणाºया वन्यप्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे प्रस्ताव वनविभागाने पाठवले होते. त्यास मंजुरी मिळून २० ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. बिबटे, मोर, ससे, तरस, काळवीट, कोल्हे, लांडगे हे वन्यप्राणी तालुक्यात आढळतात. पाटोळे, मिठसागरे, वावी, खोपडी या गावांत वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाणवठ्यांतील पाणी संपुष्टात आल्याने व वाड्या-वस्त्यांवरही नागरी वस्तीत पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा केली आहे. वन्यप्रेमींकडून या सुविधेचे स्वागत केले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई