शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:04 IST

शहराची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी कडक केली असून, सराईत गुन्हेगारांची सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धरपकड सुरू करण्यात आली आहे. मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशनसारख्या मोहिमांच्या माध्यमातून मध्यरात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी करत सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

नाशिक : शहराची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी कडक केली असून, सराईत गुन्हेगारांची सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धरपकड सुरू करण्यात आली आहे. मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशनसारख्या मोहिमांच्या माध्यमातून मध्यरात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी करत सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. अद्याप ९२ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून, फरार २१ संशयितांपैकी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉर्डर सिलिंग पॉइंटसह सर्वच नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेषत: तपोवन परिसरावर आडगाव, पंचवटी, शहर गुन्हे शाखांच्या विशेष पथकांचे लक्ष आहे.शहरात मंगळवारपासून (दि.१७) मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांचे आगमन होणार आहे. यामुळे पुढील सलग तीन दिवस शहर व परिसरात महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता राहणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर सुरक्षाव्यवस्थेचा अतिरिक्त ताण शुक्रवारपर्यंत कायम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधून दिल्लीला रवाना झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सुटकेचा नि:श्वास सोडणार आहे. यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ग्रामीण पोलीस लक्ष ठेवून आहेत तसेच शहराच्या सीमेवरील ५२ ते ५४ ‘बॉर्डर सिलिंग पॉइंट’वर पोलीस आयुक्तालयातील सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्यात शिरकाव करणाºया सर्व प्रकारच्या संशयास्पद वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. नाकाबंदीदरम्यान ५४० वाहने तपासण्यात आली आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ९२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.लॉज, हॉटेल्स, ढाबे रडारवरशहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, अशोकामार्ग, पाथर्डीफाटा, संसरीनाका, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी व गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, मद्यपी वाहनचालक, तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात येत आहेत. तसेच शहरातील हॉटेल, लॉजचीदेखील झाडाझडती घेतली जात आहेत. महामार्गांवरील ढाब्यांवरही पोलिसांच्या गस्तीपथकाचा ‘वॉच’ आहे. आतापर्यंत ९१ लॉज, ढाबे तपासण्यात आले असून ६०पेक्षा अधिक संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अद्याप शहरात पोलिसांनी १०५ टवाळखोर, ९२ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी