शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:35 IST

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजकीय नेत्यांचा सहभाग : २२ संशयितांना उद्यापर्यंत कोठडी

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.रविवारी (दि.१४) रात्री माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे पदाधिकारी साबीर गोहर यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. या अटकसत्रामुळे दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपींचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री आवामी पार्टीचे मो. रिजवान बॅटरीवाला, शेख नासीर शेख महेबूब, माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे साबीर गोहर, वसीम अख्तर मो. सलीम, अल्ताफ अन्वर शाह, मो. जाहीद अनिस अहमद कच्छी, मो. इम्रान अनिस अहमद, सराईत गुन्हेगार सरफराज, शेख जावीद, शेख इम्रान शेख सलीम, काँग्रेसचे साबीर गोहर यांना अटक करण्यात आली आहे, तर शनिवारी अटक केलेल्या मोहंमद इम्रान मोहंमद उस्मान, आसिफ शेख करीम, मोहंमद रमजान अब्दुल रहीम, मोहंमद हारुण हबीबुररहेमान अन्सारी, फैसल अहमद शकील अहमद, मोहंमद आसीफ मोहंमद युसुफ, तौसीफखान नुरखान, समसुद्दीन अन्सारी, शहेबाज अहमद जलील अहमद, मोईन अनिस, मोइनुद्दीन अब्दुल कादीर, रमजान खान शाहीद खान, आफताब एजाज बेग, शेख अलीम शेख सलीम, आसीफ अहमद निहाल अहमद, अरबाज शेख सरदार, आफताब आलम यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या १७ जणांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पथकेपोलीस यंत्रणेने दंगल व दगडफेक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या अटकसत्रामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव वाढू लागला आहे. अटकेतील संशयित आरोपी हे मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे पोलीस यंत्रणेची कोंडी झाली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होऊ नये म्हणून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliceपोलिस