शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:35 IST

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजकीय नेत्यांचा सहभाग : २२ संशयितांना उद्यापर्यंत कोठडी

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.रविवारी (दि.१४) रात्री माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे पदाधिकारी साबीर गोहर यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. या अटकसत्रामुळे दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपींचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री आवामी पार्टीचे मो. रिजवान बॅटरीवाला, शेख नासीर शेख महेबूब, माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे साबीर गोहर, वसीम अख्तर मो. सलीम, अल्ताफ अन्वर शाह, मो. जाहीद अनिस अहमद कच्छी, मो. इम्रान अनिस अहमद, सराईत गुन्हेगार सरफराज, शेख जावीद, शेख इम्रान शेख सलीम, काँग्रेसचे साबीर गोहर यांना अटक करण्यात आली आहे, तर शनिवारी अटक केलेल्या मोहंमद इम्रान मोहंमद उस्मान, आसिफ शेख करीम, मोहंमद रमजान अब्दुल रहीम, मोहंमद हारुण हबीबुररहेमान अन्सारी, फैसल अहमद शकील अहमद, मोहंमद आसीफ मोहंमद युसुफ, तौसीफखान नुरखान, समसुद्दीन अन्सारी, शहेबाज अहमद जलील अहमद, मोईन अनिस, मोइनुद्दीन अब्दुल कादीर, रमजान खान शाहीद खान, आफताब एजाज बेग, शेख अलीम शेख सलीम, आसीफ अहमद निहाल अहमद, अरबाज शेख सरदार, आफताब आलम यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या १७ जणांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पथकेपोलीस यंत्रणेने दंगल व दगडफेक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या अटकसत्रामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव वाढू लागला आहे. अटकेतील संशयित आरोपी हे मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे पोलीस यंत्रणेची कोंडी झाली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होऊ नये म्हणून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliceपोलिस