शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नांदूरशिंगोटेत स्थलांतरित ५५ जणांची निवारागृहात व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : भोजन, राहण्याची सोय; मूलभूत सुविधा पुरविणार

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक बांधकाम, दुकाने आणि कारखाने बंद पडले आहेत. यामुळे परप्रांतीय व परजिल्ह्यातील कामगार स्थलांतरित होताना दिसत आहेत. बस, खासगी वाहने आणि रेल्वे बंद असल्याने शेकडो कामगार रस्त्याने कुटुंबासह महिला व अबालवृद्धांना घेऊन जाताना दिसत आहेत. तहसीलदार राहुल कोताडे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांनी जागेची पाहणी करून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांनी या ठिकाणी शिधा पोहोचकेला आहे. कामगारांनी या ठिकाणी थांबण्याचे आवाहन तहसीलदार कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत लांडगे यांनी केले आहे. दरम्यान, गुरु वारी दुपारी दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी निवारागृहात असणार्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली.विभागीय आयुक्तांकडून तपासणीनाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी व निवारागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री अचानक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांनी नाशिकपासून अहमदनगर जिल्ह्यातील बोटा हद्दीपर्यंत असणार्या चेकपोस्टची तपासणी करून सूचना दिल्या. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत लोकांना मुलभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच नाशिक-पुणे, सिन्नर -शिर्डी व सिन्नर -घोटी मार्गावर पायी जाणार्या स्थलांतरित मजुरांना व कामगारांना या ठिकाणी थांबून आधार दिला जाणार आहे. या कामगारांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे, त्यांना आंघोळ, जेवण, स्वच्छता आणि तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिन्नर येथील एका मंगल कार्यालयात तर नांदूरशिंगोटे येथे पुणे महामार्गावर संदीप हॉटेलजवळ आणि वावी येथे शिर्डी महामार्गावर साई मनोहर सांस्कृतिक भवन येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य