शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत स्थलांतरित ५५ जणांची निवारागृहात व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : भोजन, राहण्याची सोय; मूलभूत सुविधा पुरविणार

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक बांधकाम, दुकाने आणि कारखाने बंद पडले आहेत. यामुळे परप्रांतीय व परजिल्ह्यातील कामगार स्थलांतरित होताना दिसत आहेत. बस, खासगी वाहने आणि रेल्वे बंद असल्याने शेकडो कामगार रस्त्याने कुटुंबासह महिला व अबालवृद्धांना घेऊन जाताना दिसत आहेत. तहसीलदार राहुल कोताडे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांनी जागेची पाहणी करून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांनी या ठिकाणी शिधा पोहोचकेला आहे. कामगारांनी या ठिकाणी थांबण्याचे आवाहन तहसीलदार कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत लांडगे यांनी केले आहे. दरम्यान, गुरु वारी दुपारी दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी निवारागृहात असणार्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली.विभागीय आयुक्तांकडून तपासणीनाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी व निवारागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री अचानक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांनी नाशिकपासून अहमदनगर जिल्ह्यातील बोटा हद्दीपर्यंत असणार्या चेकपोस्टची तपासणी करून सूचना दिल्या. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत लोकांना मुलभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच नाशिक-पुणे, सिन्नर -शिर्डी व सिन्नर -घोटी मार्गावर पायी जाणार्या स्थलांतरित मजुरांना व कामगारांना या ठिकाणी थांबून आधार दिला जाणार आहे. या कामगारांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे, त्यांना आंघोळ, जेवण, स्वच्छता आणि तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिन्नर येथील एका मंगल कार्यालयात तर नांदूरशिंगोटे येथे पुणे महामार्गावर संदीप हॉटेलजवळ आणि वावी येथे शिर्डी महामार्गावर साई मनोहर सांस्कृतिक भवन येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य