शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सेनेचे पुन्हा भाजपावर ‘आंदोलनास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:00 IST

विरोधी पक्षांपेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा राजकारण रंगले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने पुन्हा भाजपावर आंदोलनास्त्र चालविले असून, त्यासाठी इंधन दरवाढीचे निमित्त शोधले.

नाशिक : विरोधी पक्षांपेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा राजकारण रंगले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने पुन्हा भाजपावर आंदोलनास्त्र चालविले असून, त्यासाठी इंधन दरवाढीचे निमित्त शोधले. महापालिका निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे सेनेने आंदोलने केली त्याच धर्तीवर आता पुन्हा हेच अस्त्र सेनेने वापरले आहे. त्यावर भाजपाने सावध भूमिका घेतली असली तरी, उद्योग आणि वाहतूक खाते हे सेनेकडे असताना त्यात आंदोलन केले जाते, यापेक्षा दुसरे ‘व्यंगचित्र’ काय असू शकतील अशा शब्दात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी टीका केली आहे.  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनार्थ शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२७) द्वारका चौकात चक्का जाम करण्यात आले. राज्यात सरकारमध्ये असतानाही शिवसेनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तथापि, ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी वेळोवेळी सेनेने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत. विशेषत: विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेने महापालिका निवडणुकांचे निमित्त साधत आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचवेळी नाशिकच्या गंगापूर धरणातून औरंगाबाद-मराठवाड्यासाठी पाणी सोडणे तसेच नाशिकमधील औष्णिक विद्युत चंद्रपूर येथे हलविणे, आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून ते नागपूरला स्थलांतरित करणे अशा अनेक प्रकारचे मुद्दे सेनेने हेरले आणि काही आंदोलनात, तर मनसेसह अन्य विरोधी पक्षांनादेखील बरोबर घेतले  होते. त्यानंतर आता पुन्हा सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी शनिवारी (दि.२७) मुंबई नाका येथे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सेनेने केला असला तरी थेट प्रतिआंदोलने न करणाºया भाजपाने सेनेचे हे व्यंगचित्र आंदोलन अशी संभावना केली आहे. राज्यात वाहतूक खाते आणि उद्योग खाते हे सेनेकडे असून, त्यासंदर्भात आंदोलने करण्यात आली आहेत.  दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्याच खात्याच्या विरोधात आंदोलने करणाºया सेनेने व्यंग निर्माण केले असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केली. वाहतूक सेनेने किमान आपल्या नेत्यांची तरी आब राखणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले. सेनेचे आंदोलन नवीन नाही. सत्ता सोडून आंदोलने करा हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी सेनेला सल्ला दिला आहे. तथापि, सत्ताही सोडायची नाही आणि विरोधात आंदोलने करायची ही सेनेची पध्दत नागरिकांना आता अंगवळणी पडली आहे. भाजपा हाच जबाबदार सत्तारूढ पक्ष असल्याने त्यावर कधीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.  - लक्ष्मण सावजी,  प्रदेश चिटणीस, भाजपा

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा