शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:36 IST

कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.

नाशिक : कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.मविप्रच्या व बळीराजा गौरव समिती नााशिक यांच्यातर्फे होरायझन अकॅडमीच्या सभागृहात रविवारी (दि.२०) डॉ. आ. ह. साळुंके यांचा अमृत महोत्सवानिमित्त बळीराजा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह प्रा. उल्हास पाटील, प्रा. अर्जून कोेकाटे, प्रा. अर्जून जाधव, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, नगरसेवक स्वाती भामरे, मविप्रचे संचालक सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. डॉ. आण्णासाहेब साळुंके म्हणाले, भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती असून येथील शेतीला ५ ते ६ हजार वर्षांचा इतिहास आहे. अशी विकसित परंपरा लाभलेल्या कृषिप्रधान देशातच आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना आपण तटस्थ राहणे योग्य आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत डॉ. साळुंके यानी व्यक्त केले. प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. प्रा. अर्जून कोकाटे यांनी आभार मानले. शेतकºयांसमोरी समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक