शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:42 IST

शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे.

नाशिक : शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला  सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता  चाप बसणार आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबंधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.शिक्षण विभागाने आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करू नये, असे सरकारी धोरण आहे. त्यामुळे आठवीपर्यंत उत्तीर्ण होणारे काही विद्यार्थी नववीच्या वर्गात अडखळतात, तर अनेक विद्यार्थी नववी उत्तीर्ण होण्याची क्षमता असतानाही केवळ दहावीच्या वर्गात कमी गुण मिळवतील अथवा अनुत्तीर्ण होतील या शक्यतेने अनेक विद्यार्थ्यांना नववीच्या परीक्षेतच अनुत्तीर्ण केले जातो.दहावीच्या वर्गातील कामगरी उत्तम दिसावी, यासाठी शहरातील वेगवेगळ्या नामांकित शाळांकडून असे प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. तसेच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिला होता.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत फेरपरीक्षा घेतलीच नाही. विद्यार्थ्यांना नववीत फेरपरीक्षेची संधी देण्याऐवजी दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीत अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. शाळेचा निकाल कमी लागल्यास अथवा विद्यार्थ्यांना कमी टक्के वारी मिळाल्यास नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत आणि त्यांच्याकडून मिळणाºया डोनेशनमुळे शाळांच्या तिजोरीवर परिमाण होत आहे.‘तो’ निर्णय शिक्षण विभागाला सादर करावाविद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात नापास करण्याचे अथवा शाळा बदलण्यासाठी सांगण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, सर्व शाळांनी याविषयीचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा