शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

आराईच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण नवव्या दिवशी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:08 IST

सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थकीत मोबदला प्राप्त करुन घेण्यासाठी लवकरच नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नऊ दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर सुरु असलेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण मंगळवारी (दि.५) मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे सटाणा : थकीत मोबदल्याच्या मंजुरीचे आश्वासन

आराई येथील गोरल्या नाल्यावर शासनाने सन १९९५-९६ मध्ये पाझर तलाव बांधला होता .या तलावासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन मात्र संबधित विभागाने १५ फेब्रुवारी २००० मध्ये केल्याचे आढळून आले आहे. .प्रत्यक्षात मात्र या जमिनी पाझर तलाव बांधल्यापासून कसता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे .शासन नियमानुसार पाच वर्षाच्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला अदा करणे बंधनकारक असतांना भूसंपादन करुन वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करुनही अद्याप मोबदला मिळाला नाही .संबधित विभागाने नवीन भूसंपादन कायदा २०१३ ,नियम २०१४ अन्वये नव्याने मुल्यांकन करून व्याजासह मोबदला द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे .शेतकऱ्यांनी १६ ऑगस्ट २०१९ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २० ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी दि. ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८ ) बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते.शुक्रवारी (दि. १) रात्री उशिरा प्रभारी तहसिलदार शुभम गुप्ता ,लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता चौधरी ,शाखा अभियंता अविनाश कापडणीस ,संजय भामरे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चेच्या तीन फेर्‍या केल्या . त्यानंतर आमदार दिलीप बोरसे ,प्रभारी तहसिलदार गुप्ता यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा राहिलेला आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड ,उपअभियंता चौधरी यांनी उपोषणकर्त्या शेतकर्‍यांना पेढे भरवून उपोषण मागे घेण्यात आले.हे दिले आश्वासन...दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा होईपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी नरेंद्र सोनवणे ,अरुण सोनवणे .काकाजी देवरे ,दिगंबर सोनवणे ,विजय सोनवणे ,गोकुळ सोनवणे ,सुरेश देवरे ,माधव देवरे ,बाळासाहेब देवरे ,दत्तात्रेय देवरे ,नामदेव सोनवणे यांनी आपला मुक्काम उपोषण स्थळीच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता.सोमवारपासून पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. अखेर मंगळवारी प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार शुभम गुप्ता, आमदार दिलीप बोरसे यांचे प्रतिनिधी बिंडूशेठ शर्मा यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर दुपारी आमदार बोरसे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उर्वरित रक्कम रु . ३४,२८,४६७ रुपये जिल्हा नियोजन समितीच्या या महिन्यात होणाऱ्या सभेत तरतूद करण्यास जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे . सदरचे नियोजन हे सन २०२१-२२ चे वर्षातील असल्याने मार्च २०२१ नंतर त्यास निधी प्राप्त होईल . सदरच्या निधीची तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडून प्राप्त झाल्यावर जिल्हा नियोजनकडून निधी प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी तथा भू - संपादन अधिकारी यांच्या कार्यालयात तत्काळ जमा करण्यात येईल. तसेच सुधारीत निवाडा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संप