शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

पालखेड डावा कालवा दुरुस्ती प्रस्तावास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:07 IST

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ३८ कोटी रुपये मंजूर : एक हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.नारंगी-सारंगी प्रकल्पाच्या सोबत पालखेड डाव्या कालव्यावरील खरीप कालवाअंतर्गत असलेल्या क्रमांक ४६ ते ५२ वितरिकांना पाणी द्यावयाचे झाल्यास कालव्याच्या ११० किमीला कमीत कमी २२९ क्यूसेक इतकी पाण्याची आवश्यकता असते. सद्य:स्थितीत आवर्तन कालावधीत ११० किमीला फक्त १२० क्यूसेकइतकीच कालव्याची वहनक्षमता असून, त्यामुळे ४६ ते ५२ वितरिकांचे सिंचन चालू असताना नारंगी प्रकल्पात १२८ किमीला पाणी देणे शक्य होत नाही. नारंगी धरणात पाणी देण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो व कालव्याचा वहनव्यय वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता कालव्यावरील सर्व रब्बी, खरिपाचे सिंचन व तसेच वेळेमध्ये नारंगीला कमी कालावधीत पाणी देता यावे व कालव्याचा वहनव्यय कमी व्हावा यासाठी कालवा नूतनीकरणाची कामे करणे अत्यंत आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर १००० हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. या कामाकरिता दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ३८ कोटी २ लाख इतका निधी मंजूर झाल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.वहन क्षमता सुधारण्यासाठी दुरुस्तीसन १९८०-८२ च्या काळात येवला तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याची लांबी वाढवून तो १२८.५० किमी पर्यंत वाढवण्यात आला. शिवाय वितरिका क्रमांक ४६ ते ५२ याद्वारे खरीप सिंचन करण्यासाठी व तसेच खरीप हंगामात नारंगी-सारंगी धरण भरून देणेसाठी तो तयार करण्यात आला होता. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प, ता.वैजापूर जि. औरंगाबाद, या धरणात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून खरीप हंगामात डाव्या तट कालव्याव्दारे २०० दलघफू पाणी सोडण्यात येते. या कालव्याची वहनक्षमता कमी झाल्यामुळे नारंगी-सारंगी धरण भरण्यासाठी सद्य:स्थितीत ५८ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी व कालव्याची वहनक्षमता सुधारण्याकरिता कालवा दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढून कमीत कमी कालावधीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी