शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पालखेड डावा कालवा दुरुस्ती प्रस्तावास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:07 IST

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ३८ कोटी रुपये मंजूर : एक हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.नारंगी-सारंगी प्रकल्पाच्या सोबत पालखेड डाव्या कालव्यावरील खरीप कालवाअंतर्गत असलेल्या क्रमांक ४६ ते ५२ वितरिकांना पाणी द्यावयाचे झाल्यास कालव्याच्या ११० किमीला कमीत कमी २२९ क्यूसेक इतकी पाण्याची आवश्यकता असते. सद्य:स्थितीत आवर्तन कालावधीत ११० किमीला फक्त १२० क्यूसेकइतकीच कालव्याची वहनक्षमता असून, त्यामुळे ४६ ते ५२ वितरिकांचे सिंचन चालू असताना नारंगी प्रकल्पात १२८ किमीला पाणी देणे शक्य होत नाही. नारंगी धरणात पाणी देण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो व कालव्याचा वहनव्यय वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता कालव्यावरील सर्व रब्बी, खरिपाचे सिंचन व तसेच वेळेमध्ये नारंगीला कमी कालावधीत पाणी देता यावे व कालव्याचा वहनव्यय कमी व्हावा यासाठी कालवा नूतनीकरणाची कामे करणे अत्यंत आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर १००० हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. या कामाकरिता दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ३८ कोटी २ लाख इतका निधी मंजूर झाल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.वहन क्षमता सुधारण्यासाठी दुरुस्तीसन १९८०-८२ च्या काळात येवला तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याची लांबी वाढवून तो १२८.५० किमी पर्यंत वाढवण्यात आला. शिवाय वितरिका क्रमांक ४६ ते ५२ याद्वारे खरीप सिंचन करण्यासाठी व तसेच खरीप हंगामात नारंगी-सारंगी धरण भरून देणेसाठी तो तयार करण्यात आला होता. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प, ता.वैजापूर जि. औरंगाबाद, या धरणात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून खरीप हंगामात डाव्या तट कालव्याव्दारे २०० दलघफू पाणी सोडण्यात येते. या कालव्याची वहनक्षमता कमी झाल्यामुळे नारंगी-सारंगी धरण भरण्यासाठी सद्य:स्थितीत ५८ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी व कालव्याची वहनक्षमता सुधारण्याकरिता कालवा दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढून कमीत कमी कालावधीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी