शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नाशकात विविध प्रवर्गातील ३२ हजार शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी ; २१ हजार अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:35 IST

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे.  परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देसमाज कल्याणचे शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीसाठी विशेष शिबीर२९ डिसेंबरपासून ३२ हजार शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत

नाशिक : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे.  परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशे विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ डिसेंबर २०१८ पासून विशेष शिबीराचे आयोजन केले आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संथ गतीमुळे विद्यार्थ्यांकडूनच अर्ज प्राप्त होण्यास उशीर झाल्यामुळे महाविद्ययालयांकडून समाज कल्याण विभागाला प्रस्ताव प्राप्त होण्यास विलंब झाला होता. यातील सुमारे २५ ते २७ अर्ज अद्यापही समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेले नाही. परंतु प्राप्त झालेल्या एकूण ४३ ते ४५ हजार अर्जांपैकी समाज कल्याण विभागाने सुमारे ३२ हजार अर्ज मंजूर केले असून उर्वरित अर्जही लवकरच निकाली काढण्यात येतील असा विश्वास समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अर्जांचा वाढता ओघ लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाने २१ अतिरिक्त कर्मचारी या कामासाठी नेमले असून जिल्ह्यातील महाद्यिलयांनाही मुष्यबळ वाढवून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वेग वाढलामहाडिहीटी पोर्टलच्या संथ गतीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास विलंब झाल्याने महाविद्यालांकडूनही या प्रस्तांची पडताळणी आणि मंजूरी देण्यास विलंब झाला होता. तर अनेक महाविद्यालयांचे एकूण प्रस्तावांपैकी केवळ १० ते २० टक्के प्रस्ताव प्रलंबित होते. अशा महाविद्यालांची जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत त्यांना लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.              

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालयcollectorजिल्हाधिकारी