शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

जिल्हा परिषदेत अनुकंपावर ६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 20:23 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी

ठळक मुद्देकागदपत्रांची छाननी : समुपदेशाने रिक्त जागांवर नेमणूकरिक्तपदांच्या तुलनेत वीस टक्के जागा अनुकंपातून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा परिषदेचा अनुकंपातत्त्वावरील कर्मचारी भरतीची प्रक्रिया मंगळवारी प्रशासनाने पूर्ण केली. जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या जागांच्या २० टक्के जागा भरण्यास शासनाने अनुमती दिल्याने ६२ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून तत्काळ त्यांना समुपदेशाने नियुक्ती देण्याची कार्यवाही एकाच दिवसात पूर्ण झाल्याने अनुकंपा उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. तथापि, शासनाने सर्व प्रकारच्या कर्मचारी भरतीवर निर्बंध लादल्याने अनुकंपा भरतीला हिरवाकंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळण्याच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा धीर सुटत चालला होता. यातील काहींची वयोमर्यादा संपुष्टात येण्याची चिन्हे होती, तर हमखास नोकरी मिळण्याच्या अपेक्षेमुळे दुस-या नोकरीसाठी प्रयत्न करण्यातही अडचणी निर्माण होत होत्या. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी अनुकंपातून रिक्त जागा भरण्याची अनुमती जिल्हा परिषदांना दिली असली तरी, त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाने स्वतंत्र वेगवेगळे शासन आदेश जारी केल्यामुळे प्रशासनापुढे संभ्रम निर्माण झाला होता. रिक्तपदांच्या तुलनेत वीस टक्के जागा अनुकंपातून भरण्याची मुभा देताना शासनाने मात्र अनुकंपाची सेवाज्येष्ठता यादी न डावलण्याचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे प्रशासनापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी शासनाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले. परंतु अद्याप शासनाने त्यास होकार कळविलेला नाही. असे असले तरी, अनुकंपा उमेदवारांचा वाढता दबाव पाहता, प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ६३ कर्मचा-यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी पात्र ठरू पाहणा-या कर्मचा-यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व दुपारनंतर या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येऊन जिल्ह्यातील रिक्त असलेल्या जागांवर समुपदेशनाने नेमणुकाही करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद