शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी परीक्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्वीकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय ...

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार, याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षांपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारित वेळेत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी, बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?

पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ऑफलाइन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी. ताणतणावविरहित परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.

प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?

पाटील : नाशिक विभागातून दहावीच्या सुमारे ०००० तर बारावीच्या ००० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यामागे काय कारण असू शकते?

पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थीसंख्येत काही प्रमाणात घट दिसत असली, तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. तर, कोरोनाकाळात अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली असून त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे. मात्र, ही संख्या फारच कमी आहे.

प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का?

पाटील : शासनाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली, तर परीक्षा केंद्रेही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणावविरहित आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.