शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

खावटी वाटप कर्जालाही माफी : मधुकरराव पिचड

By admin | Updated: May 28, 2014 01:33 IST

११ लाख शेतकर्‍यांना मिळणार २५० कोटींची कर्जमाफी : आदिवासी महामंडळ बैठक ठराव संमत

११ लाख शेतकर्‍यांना मिळणार २५० कोटींची कर्जमाफी : आदिवासी महामंडळ बैठक ठराव संमतनाशिक : खावटी वाटप कर्जाच्या माध्यमातून कर्जबाजारी अकरा लाख आदिवासी शेतकर्‍यांना सुमारे २५० कोटींची कर्जमाफी करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला असून, तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिचड यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. बैठकीत आगामी काळात राबविण्यात येणार्‍या विविध योजनांबाबत चर्चा होऊन त्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील वर्षी भाताची वेळेत भरडाई न झाल्याने लाखो क्विंटल धान्य सडल्याने वाया गेले त्याची चौकशी सुरू आहे. यावर्षी मात्र ७० टक्के धान्य भरडाई झाली असून, ३० टक्के धान्य सुरक्षित गुदामात ठेवण्यात आले आहे. संचालक मंडळाने एकमुखी निर्णय घेत आदिवासी शेतकरी बांधवांना खावटी कर्जापोटी राज्यात ११ लाख शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जाला माफी द्यावी, त्यापोटी २५० कोटींची रक्कम शासनाला भरपाई करावी लागणार आहे व तसा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. ऑईल इंजिन वाटपासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली असून, पाइपपुरवठा करण्यासाठी दोन कोटींची तरतूद धरण्यात आली आहे. ३० जूनच्या आत शेतकर्‍यांना या दोन्ही साहित्याचा पुरवठा झाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश विभागाला देण्यात आले आहेत. नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत मिरची व कांदा पुरवठा करण्याचा आदेश स्थानिक महिला बचतगटांना देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी आयुक्त डॉ. संजीवकुमार, व्यवस्थापक बाजीराव जाधव, आमदार धनराज महाले, आमदार केवलराम काळे, संचालक ताराबाई माळेकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षकभरती महिनाभरातआदिवासी विकास विभागात शिक्षण विभागात शिक्षण व व्यवस्थापन असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंंग्रजीसह अन्य विषय शिकविण्यासाठी लवकरच शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.गणवेशासाठी पैसा नव्हे, कापड वाटपमागील वर्षी गणवेश घेण्यासाठी त्यांच्या पालकांना दोन गणवेशचे पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्यास आमदारांनी विरोध केल्यामुळे आणि त्यात तांत्रिक अडचणी आल्याने आता पुन्हा विद्यार्थ्यांना पैसे नव्हे, तर थेट गणवेश वाटप करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.