शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खावटी वाटप कर्जालाही माफी : मधुकरराव पिचड

By admin | Updated: May 28, 2014 01:33 IST

११ लाख शेतकर्‍यांना मिळणार २५० कोटींची कर्जमाफी : आदिवासी महामंडळ बैठक ठराव संमत

११ लाख शेतकर्‍यांना मिळणार २५० कोटींची कर्जमाफी : आदिवासी महामंडळ बैठक ठराव संमतनाशिक : खावटी वाटप कर्जाच्या माध्यमातून कर्जबाजारी अकरा लाख आदिवासी शेतकर्‍यांना सुमारे २५० कोटींची कर्जमाफी करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला असून, तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिचड यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. बैठकीत आगामी काळात राबविण्यात येणार्‍या विविध योजनांबाबत चर्चा होऊन त्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पिचड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील वर्षी भाताची वेळेत भरडाई न झाल्याने लाखो क्विंटल धान्य सडल्याने वाया गेले त्याची चौकशी सुरू आहे. यावर्षी मात्र ७० टक्के धान्य भरडाई झाली असून, ३० टक्के धान्य सुरक्षित गुदामात ठेवण्यात आले आहे. संचालक मंडळाने एकमुखी निर्णय घेत आदिवासी शेतकरी बांधवांना खावटी कर्जापोटी राज्यात ११ लाख शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जाला माफी द्यावी, त्यापोटी २५० कोटींची रक्कम शासनाला भरपाई करावी लागणार आहे व तसा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. ऑईल इंजिन वाटपासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली असून, पाइपपुरवठा करण्यासाठी दोन कोटींची तरतूद धरण्यात आली आहे. ३० जूनच्या आत शेतकर्‍यांना या दोन्ही साहित्याचा पुरवठा झाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश विभागाला देण्यात आले आहेत. नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत मिरची व कांदा पुरवठा करण्याचा आदेश स्थानिक महिला बचतगटांना देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी आयुक्त डॉ. संजीवकुमार, व्यवस्थापक बाजीराव जाधव, आमदार धनराज महाले, आमदार केवलराम काळे, संचालक ताराबाई माळेकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षकभरती महिनाभरातआदिवासी विकास विभागात शिक्षण विभागात शिक्षण व व्यवस्थापन असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंंग्रजीसह अन्य विषय शिकविण्यासाठी लवकरच शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.गणवेशासाठी पैसा नव्हे, कापड वाटपमागील वर्षी गणवेश घेण्यासाठी त्यांच्या पालकांना दोन गणवेशचे पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्यास आमदारांनी विरोध केल्यामुळे आणि त्यात तांत्रिक अडचणी आल्याने आता पुन्हा विद्यार्थ्यांना पैसे नव्हे, तर थेट गणवेश वाटप करण्यात येणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.