शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाची ओढ अन‌् दाटले चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 01:41 IST

जिल्ह्यासह सर्वदूर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे बळीराजासह सजीवसृष्टी चिंतातुर झाली असून, मृग, आर्द्रा या नक्षत्रांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सोमवारपासून (दि.४) नक्षत्र बदलत असून, ‘पुनर्वसू’ नक्षत्राचे वाहन असलेले उंदीर तरी दिलासा देऊन जाणार का, असा प्रश्न आता सर्वांच्याच मनात उठत आहे.

ठळक मुद्देदडी कायम : ‘पुनर्वसू’चे उंदीर दिलासा देणार का?

नाशिक : जिल्ह्यासह सर्वदूर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे बळीराजासह सजीवसृष्टी चिंतातुर झाली असून, मृग, आर्द्रा या नक्षत्रांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सोमवारपासून (दि.४) नक्षत्र बदलत असून, ‘पुनर्वसू’ नक्षत्राचे वाहन असलेले उंदीर तरी दिलासा देऊन जाणार का, असा प्रश्न आता सर्वांच्याच मनात उठत आहे.

यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक मान्सूनचा वर्षाव होईल, असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेल्यानंतर, सर्वांनाच तात्पुरता का होईना दिलासा मिळाला. मान्सूनचे राज्यात वेळेवर आगमन झाले अन‌् शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शहरासह जिल्ह्यात ५ जून रोजी पावसाने जोरदार सलामी दिली. यामुळे यंदा हवामान खात्याचा अंदाज पूर्णत; खरा ठरणार असल्याचे चित्र दिसत होते, तसेच मान्सूनपूर्व सरीही दमदार बरसल्याने शेतकऱ्यांकडून मशागतीच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या. खरिपाच्या पेरणीचाही बहुतांश ठिकाणी बळीराजाने ‘श्रीगणेशा’ केला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ हे तीन तालुके वगळता, अन्य तालुक्यांमध्ये फारसे समाधानकारक पर्जन्यमान अद्याप तरी राहिलेले आकडेवारीवरून दिसत नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक कमी केवळ १० मिमी इतका पाऊस येवला आणि नांदगाव तालुक्यात नोंदविला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५३८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात केवळ १०१.१ मिमी इतका पाऊस पडला आहे, तसेच जिल्ह्यात १ हजार ७३१ मिमी इतका पाऊस पडला आहे. शहरात १ जून रोजी २३ तर १९ जून रोजी सर्वाधिक २७.३ मिमीपर्यंत इतका पाऊस पडला होता.

पावसाने अचानकपणे विश्रांती घेतल्यामुळे सर्वदूर चिंतेचे ढग दाटले असून, बळीराजासह सर्वांनीच आकाशाकडे नजरा लावल्या आहेत. मात्र, मान्सूनला अनुकूल अशी स्थिती अद्यापही राज्यात निर्माण होत नसल्याने पावसाचे ढग दाटणार तरी कधी, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस