शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनाथाची ‘नाथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:34 IST

जेमतेम दोन महिने वय असताना आई-वडिलांनी पंढरपूरच्या नवरंग बालकाश्रमाच्या बाहेर ठेवून पोबारा केला, वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन मुलीची ओळख पटविण्याचे ...

ठळक मुद्देबारामती येथे एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी पत्करली नवऱ्याला दारूचे व्यसन, नोकरीचा पत्ता नाही व त्यात एक अपत्य

जेमतेम दोन महिने वय असताना आई-वडिलांनी पंढरपूरच्या नवरंग बालकाश्रमाच्या बाहेर ठेवून पोबारा केला, वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु कोणताही प्रतिसाद नातेवाईक, समाजाकडून मिळाला नाही. अशावेळी बालकाश्रम हेच घर व तेथील व्यक्ती हेच नातेवाईक, मित्र-मैत्रीण असे समीकरण तयार झाले ते आजवर कायम आहे. रक्ताचे नाते कोणाशीही नसताना नाव, गाव तरी कोठून मिळणार? परंतु बालकाश्रमानेच नाव दिले ‘आरती अंजली माने’ आणि तीच ओळख कायम राहिली अगदी शिक्षण, लग्न व नोकरीस लागेपर्यंत. अनाथ म्हणून जन्मास आलेल्या आरती या सध्या नारी विकास संस्थेत अधीक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांच्या प्रमाणेच अनाथ म्हणून समाजात वाढलेल्यांच्या ‘नाथ’ म्हणून कार्य करीत आहेत. बेवारस, अनाथ अशा समाजानेच एकेकाळी नावे ठेवलेल्या आरती यांनी मात्र संघर्ष व जिद्द कायम ठेवत शिक्षण पूर्ण केले. नांदेडच्या सुमन, पुण्याच्या सेवाग्राम अशा विविध अनाथाश्रमात राहून वयाची अठरा वर्षे पूर्ण केली. अज्ञान असल्यामुळे अनाथाश्रमातील स्वत:ची कामे स्वत: करून शिक्षण घेणाऱ्या आरतीने नंतर बारामती येथे एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी पत्करली व त्यातून तिचा व्यक्तिगत खर्च भागविला, याचदरम्यान लग्नाचे वय झाल्याने तिने नांदेडच्या आश्रमात जाऊन लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली व वृत्तपत्रातून जाहिरात देऊन योग्य वर शोधण्यास सुरुवात झाली. अनेकांनी आरतीला निव्वळ अनाथ म्हणून नाकारले, पण त्यातही औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील एका ब्राह्मण समाजाने स्थळाला पसंती दर्शविली. मुलगा नाशिकच्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असल्याचे सांगून लग्न लावून घेतले. ब्राह्मण समाजात मुली नसल्यामुळेच अनाथ मुलीला सून केल्याचे समाजात मिरवून घेतले, परंतु प्रत्यक्षात नाशिकला आल्यावर आरतीचे स्वप्न भंग झाले. नवऱ्याला दारूचे व्यसन, नोकरीचा पत्ता नाही व त्यात एक अपत्य कसे सांभाळावे, अशा विवंचनेत असलेल्या आरतीची पावले पुन्हा एकदा अनाथाश्रमाकडे वळाली. नाशिकच्या नारी विकास संस्थेची तिने वाट धरली व स्वत:च्या उदरनिर्वाहाचा मार्ग निवडला. ज्या परिस्थितीतून तिने मार्गक्रमण केले तशी परिस्थिती अन्य कोणावर ओढवू नये म्हणून आरतीने या संस्थेची अधीक्षिका म्हणून नोकरी सुरू केली, परंतु त्याचबरोबर गावोगावी जाऊन तरुण मुलींना स्वबळावर उभे करण्याबरोबरच नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनNashikनाशिक