शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘पकोडे’ आंदोलनाला रोजगार निर्मितीतून उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:31 IST

आजवर राज्य शासनाकडून दरवर्षी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधांसाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चासाठी संबंधित विभागाकडून अगोदर योजनानिहाय व लाभार्थीनिहाय निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून त्याचा आराखडा तयार करावा लागतो व

ठळक मुद्देसरकारचा उतारा : ‘पकोडा’ आंदोलनाला प्रत्युत्तरविकास निधीतून रोजगार निर्मिती साधण्याचा निर्णय

नाशिक : देशपातळीवर बेरोजगारांच्या वाढत्या संख्येने राजकीय वातावरण ढवळून निघून निवडणूक प्रचाराचा तो महत्त्वाचा मुद्दा ठरल्याने देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी बेरोजगारी कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विरोधकांनीदेखील याच प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ‘पकोडा’ आंदोलन हाती घेतल्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने आता जिल्ह्यांना दरवर्षी विकासकामांसाठी दिल्या जाणा-या विकास निधीतून रोजगार निर्मिती साधण्याचा निर्णय घेतला आहे.आजवर राज्य शासनाकडून दरवर्षी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधांसाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चासाठी संबंधित विभागाकडून अगोदर योजनानिहाय व लाभार्थीनिहाय निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून त्याचा आराखडा तयार करावा लागतो व त्याचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर शासनाकडून निधी वितरित केला जातो. सरकारने दिलेल्या या निधीत कपात वा वाढ करण्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकारला असून, अधिका-यांनी आराखड्यानुसार विकास निधी पूर्णत: खर्च करणे बंधनकारक करण्यात येते, त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधितांना समजही दिली जाते. सर्वसाधारणपणे जिल्हा विकास निधीच्या विनियोगाची हीच पद्धत आहे. परंतु आता राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा विकास निधी रोजगार निर्मिती क्षेत्रासाठी वापरण्याचे आवाहन सर्व जिल्हाधिका-यांना केले आहे. नाशिक येथे सोमवारी झालेल्या राज्यस्तरीय जिल्हा नियोजन विकास बैठकीत त्यांनी तसे जाहीरच केले आहे. या कामासाठी निधी कमी पडल्यास वाढीव मागणी अधिका-यांनी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.देशात व राज्यात सर्वत्र बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. विरोधकांच्या मते बेरोजगारी कमी होण्याऐवजी नोटाबंदी व जीएसटीनंतर बेरोजगारीत वाढ झाल्याने सरकार नोक-या देण्यास अपयशी ठरल्याचे आरोप केले जात आहेत. त्यावर सरकारकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून, त्यातूनच ‘पकोडे’ विक्रीदेखील एकप्रकारे रोजगार निर्मिती असल्याचे समर्थन सरकारकडून केले जात असल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी देशात ठिकठिकाणी ‘पकोडे’ आंदोलन सुरू केले आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक