शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

निफाडच्या प्रयत्न विचार मंचचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:58 IST

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

ठळक मुद्देमाशाला उडायला सांगितले तर उडता येणार नाही. पक्षाला पोहायला सांगितले तर पोहता येणार नाही याच तत्त्वाने पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांमधील सुप्त गुण आणि त्याची कुवत ओळखून त्याला जे आवडेल, जे जमेल त्याच्यात प्रावीन्य मिळविण्याची संधी द्यावी. स्वत:च्या अपेक्षा

निफाड : येथील प्रयत्न विचार मंच या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील दीपस्तंभ फाउन्डेशनचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.प्रारंभी प्रा. यजुर्वेन्द्र महाजन, राजेंद्र सोमवंशी, सुनील जाधव, संजय आहेर, सुहास सुरळीकर यांच्या हस्ते माता जिजाऊ, क्र ांतिज्याती सावित्रीबाई फुले, राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कुंडीतील रोपट्यास पाणी घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.महाजन यांनी प्रशासकीय अधिकारी घडविणाऱ्या दीपस्तंभ फाउन्डेशनच्या कार्याची माहिती दिली.आजकाल सर्वांनाच मोबाइल हवाहवासा आणि अत्यावश्यक वाटतो. विद्यार्थ्यांनी दिवसातून फक्त १५मिनिटं आणि ३ वेळाच मोबाइल वापरला तरी गरजेपुरती आवश्यक ती माहिती मिळू शकते. अन्यथा मोबाइलच्या अतिवापराने पुढील पिढी बिघडण्याची भीती असते, असे महाजन म्हणाले. महापुरु षांची पुस्तके वाचा, त्यांच्या विचारांचे अनुकरण करा, आईवडील व गुरु जनांचा आदर करा, रोज किमान अर्धा तास व्यायाम करा असे केल्याने पाच वर्षे आयुष्य वाढेल, असा सल्लाही त्यांनी दिला. तुम्हाला जे करायचे ते सर्वोत्तम, बेस्ट करा जीवनात नकीच यशस्वी व्हाल, असा कानमंत्र त्यांनी दिला.या प्रसंगी वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी, अनिल कुंदे, जावेद शेख, देवदत्त कापसे, ना.भा. ठाकरे, मधुकर व्यवहारे, विक्र म रंधवे, सोमनाथ आंधळे, सुनील राठोर, अभिजित चोरडिया, भारती कापसे आदींसह बाळासाहेब कापसे, सुनील चिखले, महेश बनकर, प्रवीण ढेपले, चंद्रभान जाधव, बा. बा. गुंजाळ, प्रकाश परदेशी, विजय डेर्ले, दत्तू बागडे, संजय श्रीवास्तव, भारत बैरागी, नाथाभाऊ खरात, खैरे तात्या, किसन चौधरी, श्रीकांत रायते, तन्वीर राजे, राजाराम धारराव, विनोद बनकर उपस्थित होते.प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. संजय आहेर यांनी आभार मानले.