शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:51 IST

लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले

दिंडोरी : लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले. दरम्यान चारणवाडीसह सर्व बंधाºयांचे काम सुरू करण्याचे आश्वासना मिळाल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. साठवण बंधाºयांची कामे होईपर्यंत बोगद्याचे काम बंदच ठेवण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहे. मांजरपाडा प्रकल्प करताना स्थानिक आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकºयांसाठी पाणी राखीव ठेवत त्यासाठी परिसरात विविध लघुबंधारे बांधण्याचे ठरले होते. नुकतेच रखडलेल्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू झाले; मात्र त्यामुळे परिसरातील विहीर, बोअरवेलचे पाणी गेल्याने शेतकºयांनी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी प्रकल्पास भेट देत अधिकाºयांशी चर्चा केली. सात दिवसात पूर्वी ठरल्याप्रमाणे बंधाºयांची कामे सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र लघुपाटबंधारे विभागाने बोगद्याच्या कामामुळे विहिरी -बोअरवेलचे पाणी कमी झाल्याचा इन्कार करत राखीव पाणी साठ्यासाठी कामे मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असल्याचा खुलासा केला होता. यानंतर आदिवासी प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांमध्ये अजून नाराजी वाढत शेतकºयांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला. आज देवसाने येथे लघुपटबंधारे विभागाचे अभियंता संघानी हे आले असता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार झरिवाळ,स् ाभापती एकनाथ गायकवाड, अभियंता संघांनी यांच्या उपस्थितीत मारु ती मंदिरात बैठक बोलावली. आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आहे याच मांजरपाडा प्रकल्पांतर्गत चारणवाडीसह विविध बंधाºयांची कामे सुरू करण्याची मागणी केली; मात्र अधिकारी हे फक्त शासन निर्णय वाचून दाखवत होते. आपला विश्वासघात झाल्याचे सांगत शेतकयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार, सभापतीसह अधिकाºयांना मंदिरात कोंडत प्रकल्पाचे काम बंद पाडले. यानंतर टायर जाळत निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचे वृत्त समजताच प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली तर तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी जिप उपद्याक्ष प्रकाश वडजे,पस उपसभापती उत्तम जाधव विश्वासराव देशमुख,माजी पस सदस्य गोपीनाथ गांगुर्डे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मांजरपाडा प्रकल्पाला येथील शेतकयांचा विरोध नाही; परंतु हा प्रकल्प होताना स्थानिक शेतकºयांना पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी परिसरात विविध लघुपाटबंधारे साठवण बंधारे बांधण्याचा निर्णय झाला होता. मात्र अधिकाºयांनी दिशाभूल करत सदर बंधाºयांची कामे सुरू न करता ते मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचे समजल्या स्थानिक जनतेचा रोष होणे साहजिकच होते. सात दिवसांपूर्वी शेतकºयांनी तसा इशारा दिला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने अधिकाºयांनी बेजबाबदार उत्तरे दिल्याने आजचा प्रसंग उदभवला. आता प्रशासनाने तातडीने सर्व कामे हाती घ्यावी व स्थानिक जनतेला न्याय द्यावा. - नरहरी झिरवाळ, आमदार

टॅग्स :FarmerशेतकरीDamधरण