शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:51 IST

लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले

दिंडोरी : लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले. दरम्यान चारणवाडीसह सर्व बंधाºयांचे काम सुरू करण्याचे आश्वासना मिळाल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. साठवण बंधाºयांची कामे होईपर्यंत बोगद्याचे काम बंदच ठेवण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहे. मांजरपाडा प्रकल्प करताना स्थानिक आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकºयांसाठी पाणी राखीव ठेवत त्यासाठी परिसरात विविध लघुबंधारे बांधण्याचे ठरले होते. नुकतेच रखडलेल्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू झाले; मात्र त्यामुळे परिसरातील विहीर, बोअरवेलचे पाणी गेल्याने शेतकºयांनी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी प्रकल्पास भेट देत अधिकाºयांशी चर्चा केली. सात दिवसात पूर्वी ठरल्याप्रमाणे बंधाºयांची कामे सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र लघुपाटबंधारे विभागाने बोगद्याच्या कामामुळे विहिरी -बोअरवेलचे पाणी कमी झाल्याचा इन्कार करत राखीव पाणी साठ्यासाठी कामे मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असल्याचा खुलासा केला होता. यानंतर आदिवासी प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांमध्ये अजून नाराजी वाढत शेतकºयांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला. आज देवसाने येथे लघुपटबंधारे विभागाचे अभियंता संघानी हे आले असता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार झरिवाळ,स् ाभापती एकनाथ गायकवाड, अभियंता संघांनी यांच्या उपस्थितीत मारु ती मंदिरात बैठक बोलावली. आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आहे याच मांजरपाडा प्रकल्पांतर्गत चारणवाडीसह विविध बंधाºयांची कामे सुरू करण्याची मागणी केली; मात्र अधिकारी हे फक्त शासन निर्णय वाचून दाखवत होते. आपला विश्वासघात झाल्याचे सांगत शेतकयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार, सभापतीसह अधिकाºयांना मंदिरात कोंडत प्रकल्पाचे काम बंद पाडले. यानंतर टायर जाळत निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचे वृत्त समजताच प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली तर तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी जिप उपद्याक्ष प्रकाश वडजे,पस उपसभापती उत्तम जाधव विश्वासराव देशमुख,माजी पस सदस्य गोपीनाथ गांगुर्डे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मांजरपाडा प्रकल्पाला येथील शेतकयांचा विरोध नाही; परंतु हा प्रकल्प होताना स्थानिक शेतकºयांना पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी परिसरात विविध लघुपाटबंधारे साठवण बंधारे बांधण्याचा निर्णय झाला होता. मात्र अधिकाºयांनी दिशाभूल करत सदर बंधाºयांची कामे सुरू न करता ते मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचे समजल्या स्थानिक जनतेचा रोष होणे साहजिकच होते. सात दिवसांपूर्वी शेतकºयांनी तसा इशारा दिला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने अधिकाºयांनी बेजबाबदार उत्तरे दिल्याने आजचा प्रसंग उदभवला. आता प्रशासनाने तातडीने सर्व कामे हाती घ्यावी व स्थानिक जनतेला न्याय द्यावा. - नरहरी झिरवाळ, आमदार

टॅग्स :FarmerशेतकरीDamधरण