शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

साथरोगावर सीईओ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:53 IST

नाशिक : जिल्ह्यात उद्भवलेल्या साथरोग आजाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिसारामुळे जिल्ह्यात पाच मृत्यू झाल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर बेजबादारपणे काम करणाºया अधिकाºयांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही गिते यांनी दिला.

ठळक मुद्देअधिकारी फैलावर : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

नाशिक : जिल्ह्यात उद्भवलेल्या साथरोग आजाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिसारामुळे जिल्ह्यात पाच मृत्यू झाल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर बेजबादारपणे काम करणाºया अधिकाºयांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही गिते यांनी दिला.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारी तालुक्यातील गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, आरोग्य व ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, गट समन्वयक, समूह समन्वयक यांची तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.मुख्य कार्यकारी रजेवरून आल्यानंतर त्यांनी तत्काळ अधिकाºयांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने काम करणे आवश्यक असून, यापुढे जिल्ह्यात साथरोगाचा उद्रेक झाल्यास यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.सुरगाणा व कळवण तालुक्यांत अतिसाराच्या साथीचा उद्रेक होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गिते यांनी स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत अनेकदा बैठका घेऊन आणि प्रत्यक्ष काही कारवाया करूनही कामकाजात कुचराई करण्यात आल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. कामकाजाबाबत अधिकाºयांमध्ये गांभीर्य नसल्याचे तसेच मुख्यालयी न राहिल्यामुळे मुख्य कार्यालयाशी त्यांचा समन्वय कमी झाल्याची बाबही गिते यांनी निदर्शनास आणून दिली.ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध आहे का? पाणीपुरवठा योजनेत गळती आहे का? याबाबत तपासणी करण्याचे व हातपंप तसेच विहिरी वापरात नसतील तर सदरचे स्रोत कायमचे बंद करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश सर्व गट विकास अधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, राजेंद्र पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.पाणी स्रोतांची तपासणी करण्याचे आदेशसुरगाणा व कळवण तालुक्यांत घडलेल्या साथ उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सर्व उपअभियंता यांनी तालुकास्तरावरील सर्व कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांच्या मदतीने येत्या दोन दिवसांत प्रत्येक तालुक्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी करून त्यात कोणत्या उणिवा आहेत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कोणत्याही पाण्याच्या स्रोतात जोखीम राहणार नाही यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश सर्व यंत्रणेला देण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद