शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:18 IST

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात.

ठळक मुद्दे विंचूर : पिंपळगाव, लासलगाव येथील शेतकरी पुन्हा संकटात

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात. खते, औषधांचे आण िमजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. अवजारे किंवा खते औषधे त्यावर नव्यानेच लागू झालेला जीएसटी ने तर पार कंबरडेच मोडून गेले आहे.केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान जाहीर केले होते. अनुदान अचानक बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे सरकारने निर्यातीवर अनुदान जाहीर केले. त्यामुळे भाव टिकून राहण्यास मदत झाली. गेल्या वर्षी अचानक कांद्याचे बाजारभाव वीस रु पये किलोपर्यंत गेले होते. पाकिस्तानमधुन पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या मार्गाने कांदा आल्याने बाजारभाव घसरु न पाच रु पये किलोपर्यंत आले. परिणामी व्यापारी व शेतकर्यांचे नुकसान झाले. काही शेतकर्यांचा कांदा जागेवरच सडला, काहींनी कांदा शेतात फेकून दिला. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कांदा लावगडीत काहीशी घट झाली आहे.   कांद्याचे भाव साधारण आठ रु पये किलोपर्यंत होते. यावर्षी तरी कांद्याचे पैसे होतील. या आशेने शेतकर्यांनी कांदा साठवुन ठेवला. बाहेरील कांदा संपत आला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत गेल्यामुळे पंधरा ते वीस दिवसात कांदा १६ ते१७ रु पये किलो पर्यंत पोहचला. दररोज वाढणार्या भावामुळे   बाजारभाव वाढत असल्याचे पाहुन बराचसा साठवलेला कांदा विक्र ीसाठी काढला नाही. अचानक झालेल्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे निर्यातीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. परिणामी होणार्या भाववाढीला खीळ बसू शकते.असा अंदाज विंचूर येथील कांदा खरेदीदार योगेश कदम व्यक्त केला. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर एक मिहन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढु लागले होते. परंतु कांदा निर्यातीवरील अनुदान बंद झाल्याने कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता मावळली आहे.