शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:18 IST

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात.

ठळक मुद्दे विंचूर : पिंपळगाव, लासलगाव येथील शेतकरी पुन्हा संकटात

विंचूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसर्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी१५० ते २०० रु पयांपर्यंत घसरले. कांद्याला थोडाफार बाजारभाव वाढत चालल्यामुळे  आनंदाचे वातावरण होते. परंतु केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे  नाराजीचे सूर दिसून येत आहेत. पीक जोमात आले की बाजारभाव पडतात आण िपिकांचे उत्पादन कमी झाले कि भाववाढीमुळे सरकार अनुदान बंद करते किंवा निर्यात बंद करतात. खते, औषधांचे आण िमजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. अवजारे किंवा खते औषधे त्यावर नव्यानेच लागू झालेला जीएसटी ने तर पार कंबरडेच मोडून गेले आहे.केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान जाहीर केले होते. अनुदान अचानक बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे सरकारने निर्यातीवर अनुदान जाहीर केले. त्यामुळे भाव टिकून राहण्यास मदत झाली. गेल्या वर्षी अचानक कांद्याचे बाजारभाव वीस रु पये किलोपर्यंत गेले होते. पाकिस्तानमधुन पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या मार्गाने कांदा आल्याने बाजारभाव घसरु न पाच रु पये किलोपर्यंत आले. परिणामी व्यापारी व शेतकर्यांचे नुकसान झाले. काही शेतकर्यांचा कांदा जागेवरच सडला, काहींनी कांदा शेतात फेकून दिला. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कांदा लावगडीत काहीशी घट झाली आहे.   कांद्याचे भाव साधारण आठ रु पये किलोपर्यंत होते. यावर्षी तरी कांद्याचे पैसे होतील. या आशेने शेतकर्यांनी कांदा साठवुन ठेवला. बाहेरील कांदा संपत आला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत गेल्यामुळे पंधरा ते वीस दिवसात कांदा १६ ते१७ रु पये किलो पर्यंत पोहचला. दररोज वाढणार्या भावामुळे   बाजारभाव वाढत असल्याचे पाहुन बराचसा साठवलेला कांदा विक्र ीसाठी काढला नाही. अचानक झालेल्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद केल्यामुळे निर्यातीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. परिणामी होणार्या भाववाढीला खीळ बसू शकते.असा अंदाज विंचूर येथील कांदा खरेदीदार योगेश कदम व्यक्त केला. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर एक मिहन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढु लागले होते. परंतु कांदा निर्यातीवरील अनुदान बंद झाल्याने कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता मावळली आहे.