शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लष्करी अळीला कंटाळून मक्यावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:59 IST

ब्राह्मणगाव : लष्करी अळीने मका पिकावर सर्वत्र थैमान घातले आहे. त्यावर शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फवारण्या करूनही अळी आटोक्यात येत नसल्याने मका पिकावर मोठे संकट आले आहे. सर्व उपाययोजना निष्फळ ठरल्याने येथील शेतकरी बाळासाहेब अहिरे यांनी तीन एकर मका पिकावर नांगर फिरविला आहे.

ब्राह्मणगाव : लष्करी अळीने मका पिकावर सर्वत्र थैमान घातले आहे. त्यावर शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फवारण्या करूनही अळी आटोक्यात येत नसल्याने मका पिकावर मोठे संकट आले आहे. सर्व उपाययोजना निष्फळ ठरल्याने येथील शेतकरी बाळासाहेब अहिरे यांनी तीन एकर मका पिकावर नांगर फिरविला आहे.मका पेरणीपासून आजपर्यंत खर्च पाहता व लष्करी अळीमुळे विविध प्रकारच्या हजारो रु पयांच्या औषध फवारण्या करून पीक हाताशी येणार नाही, हे लक्षात येताच उद्विग्न झालेल्या अहिरे यांनी पिकात रोटर फिरविला आहे. तीन एकर मका पिकासाठी ४९ हजार दोनशे रु पये खर्च केला असून, केलेला खर्च पूर्णत: निष्फळ ठरला आहे. मका पीक मोठे झाल्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक घेतल्यानंतर निव्वळ खर्चही सुटणार नाही अशा विवंचनेत असलेल्या अहिरे यांनी हे पाऊल उचलले. मका हे पीक कसमादे परिसरातील नगदी पीक असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाली होती; परंतु यंदाच्या हंगामात अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. महागडी बियाणे खरेदी करून पेरणीपासून मजुरी, फवारणी, नांगरणी, खते हा सर्व खर्च पाहता पूर्णत: वाया गेल्याची प्रतिक्रिया अहिरे यांनी दिली. शासनाने लष्करी अळीच्या बंदोबस्ताबाबत केलेले मार्गदर्शनही व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांचे नुकसान पाहता तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक